शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सुभाषनगरात दाऊद, याकुब, मन्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:09 IST

नागपूर : उपराजधानीतील गुंडगिरीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. याच उपराजधानीतील सुभाषनगरचे नागरिक दाऊद, याकुब व मन्याच्या दहशतीने चांगलेच हैराण ...

नागपूर : उपराजधानीतील गुंडगिरीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. याच उपराजधानीतील सुभाषनगरचे नागरिक दाऊद, याकुब व मन्याच्या दहशतीने चांगलेच हैराण झाले आहेत. ही तीन नावे कुण्या गुंडांची नसून, परिसरातील वळूंची आहेत. त्यांच्या ‘वळुगिरी’मुळे सुभाषनगर व अवतीभोवतीच्या परिसरात अघोषित संचारबंदी लागली आहे. परिसरातील लहानगे सुटी असूनही घरातच बंद आहेत. मोठ्यांनी सकाळ, संध्याकाळी फिरण्याला व मैदानावरील व्यायामाला तिलांजली दिली आहे.

फुटलेल्या मालवाहतूक ऑटोरिक्षा, तुटलेले गेट, पाय तुटलेले तरुण आणि घरांचे गेट बंद करून आत दहशतीत बसलेले नागरिक असे चित्र सध्या सुभाषनगरात बघायला मिळत आहे. मोकाट सुटलेल्या या वळूंच्या गोंधळामुळे स्थानिक नागरिकांनीच त्यांना ही नावे दिली आहेत. सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरात या तीन वळूंनी गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: धुडगूस घातला आहे. वळूंच्या लढाईमुळे परिसरात अनेकांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या लढाईत काहींच्या दुचाकीचे, तर काहींच्या घराचे नुकसान झाले. लहान मुलांना तर एकटे बाहेर निघण्याची परवानगीच नाही. दोन दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्याचा ठेला या वळूच्या लढाईत अडकला आणि वळूंनी पाच हजारांची भाजी पायाखाली तुडवत मोठे नुकसान केले. सिलिंडरवाल्याची ऑटोरिक्षाच वळूंनी उलटविली. एवढेच नाही तर वळूच्या अफाट ताकतीमुळे मैदानाची संरक्षक भिंतीचा काही भागही कोसळला आहे.

परिसरातील मैदानात रोज सकाळी, संध्याकाळी लहान मुले खेळायला यायची. अनेक जण मॉर्निंग, इव्हिनिंग वॉक करायचे. आता मैदानात जायला कोणी धजावत नाही. परिसरातील शंकर पंचेश्वर, छाया चतुरकर, प्रभुनाथ विश्वकर्मा, शीला चव्हाण यांच्या घरचे, कुटुंबाचे नुकसान झाले आहे. महापालिकेने लवकरात लवकर या वळूंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.