शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

गावागावातील रस्त्यांवर पसरणार अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : गावातील पथदिव्यांचे वीज बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावे, असे परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढले आहे. पण ...

नागपूर : गावातील पथदिव्यांचे वीज बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावे, असे परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढले आहे. पण १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये यंदा कपात करण्यात आली आहे. त्यातही वेगवेगळ्या हेडवरील वित्त आयोगाच्या निधीतून करावयाचा खर्च आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर पथदिव्यांचे थकीत असलेले वीज बिल भरावे तरी कुठून असा सवाल ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी प्रशासनाला केला आहे. वीज बिल भरले नाही तर महावितरण वीज कापणार हे निश्चित आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीची यंदा मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. ज्या ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचे ८ ते ८.५० लाख रुपये मिळायचे. त्या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून ४ ते ४.५० लाख रुपये मिळणार आहे. त्यातून महिला व बाल विकास, अपंग, शिक्षण, आरोग्य, प्रशासकीय खर्च करावयाचा आहे. शिवाय ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचे १ लाख ४७ हजार रुपये शासनाकडे जमा करायचे आहे. त्यात आता ग्रामविकास विभागाने पथदिव्यांचे वीज बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविली आहे. त्याला सरपंचांनी विरोध दर्शविला आहे. आराखड्याप्रमाणे विकास कामे करण्यासाठी कोणताच निधी ग्रामपंचायतीकडे शिल्लक राहणार नाही, अशी ओरड सरपंचांची आहे.

- ऊर्जा विभागाची शासन निर्णयाकडे पाठ

२०१८ पासून पथदिव्यांच्या वीज बिलाचा प्रश्न राज्यभरातील ग्रामपंचायतींना भेडसावत आहे. ऊर्जा विभागाने शासन निर्णय काढून २०१८ पूर्वीच्या विद्युत खांबाचे वीज बिल शासन भरेल व त्यानंतरच्या वीज खांबाचे वीज बिल ग्रामपंचायत भरेल. या शासन निर्णयाकडे ऊर्जा विभागाने पाठ दाखविली आहे. आता ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाने वीज बिलाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविली आहे. राज्यभरात हा विषय चिघळत असून सरपंच सेवा महासंघाने त्याचा विरोध केला आहे. आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

मनिष फुके, सरचिटणीस, सरपंच सेवा महासंघ