शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

गावागावातील रस्त्यांवर पसरणार अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : गावातील पथदिव्यांचे वीज बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावे, असे परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढले आहे. पण ...

नागपूर : गावातील पथदिव्यांचे वीज बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावे, असे परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढले आहे. पण १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये यंदा कपात करण्यात आली आहे. त्यातही वेगवेगळ्या हेडवरील वित्त आयोगाच्या निधीतून करावयाचा खर्च आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर पथदिव्यांचे थकीत असलेले वीज बिल भरावे तरी कुठून असा सवाल ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी प्रशासनाला केला आहे. वीज बिल भरले नाही तर महावितरण वीज कापणार हे निश्चित आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीची यंदा मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. ज्या ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचे ८ ते ८.५० लाख रुपये मिळायचे. त्या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून ४ ते ४.५० लाख रुपये मिळणार आहे. त्यातून महिला व बाल विकास, अपंग, शिक्षण, आरोग्य, प्रशासकीय खर्च करावयाचा आहे. शिवाय ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचे १ लाख ४७ हजार रुपये शासनाकडे जमा करायचे आहे. त्यात आता ग्रामविकास विभागाने पथदिव्यांचे वीज बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविली आहे. त्याला सरपंचांनी विरोध दर्शविला आहे. आराखड्याप्रमाणे विकास कामे करण्यासाठी कोणताच निधी ग्रामपंचायतीकडे शिल्लक राहणार नाही, अशी ओरड सरपंचांची आहे.

- ऊर्जा विभागाची शासन निर्णयाकडे पाठ

२०१८ पासून पथदिव्यांच्या वीज बिलाचा प्रश्न राज्यभरातील ग्रामपंचायतींना भेडसावत आहे. ऊर्जा विभागाने शासन निर्णय काढून २०१८ पूर्वीच्या विद्युत खांबाचे वीज बिल शासन भरेल व त्यानंतरच्या वीज खांबाचे वीज बिल ग्रामपंचायत भरेल. या शासन निर्णयाकडे ऊर्जा विभागाने पाठ दाखविली आहे. आता ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाने वीज बिलाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविली आहे. राज्यभरात हा विषय चिघळत असून सरपंच सेवा महासंघाने त्याचा विरोध केला आहे. आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

मनिष फुके, सरचिटणीस, सरपंच सेवा महासंघ