शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर अंधार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : नागपूर-जबलपूर (मध्य प्रदेश) हा राष्ट्रीय महामार्ग कामठी शहराच्या मध्यभागातून गेला आहे. शहरात या मार्गाच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : नागपूर-जबलपूर (मध्य प्रदेश) हा राष्ट्रीय महामार्ग कामठी शहराच्या मध्यभागातून गेला आहे. शहरात या मार्गाच्या दुभाजकावर ठिकठिकाणी पथदिवे लावले आहेत. मात्र, हे पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने त्याचा उपयाेग काय, असा प्रश्न कामठीवासीयांनी उपस्थित केला आहे. रात्रीच्यावेळी हा संपूर्ण महामार्ग अंधारात राहात असल्याने नागरिकांना राेज विविध समस्यांना ताेंड द्यावे लागते.

या राष्ट्रीय महामार्गावर कामठी शहरातील गरूड चौकापासून कमसरी बाजारापर्यंत, तसेच शहरातील मुख्य मार्गावरील जयस्तंभ चौक ते शुक्रवारी बाजार, पोलीस लाईन, मेन रोड, राम मंदिर चौकापर्यंत ठिकठिकाणी पथदिवे लावण्यात आले आहेत. या दाेन्ही मार्गाला दुभाजक असून, त्यावरील पथदिवे महिनाभरापासून बंद आहेत.

सध्या श्रीगणेश उत्सव सुरू असून, यावर्षी शहरात ५३ सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. काेराेना संक्रमण कमी झाल्याने आधीच राेडवरील वर्दळ वाढली हाेती. त्यातच शहरातील बहुतांश नागरिक रात्रीच्या वेळी कुटुंबीयांसह गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जातात. त्यामुळे राेडवरील गर्दीत वाढ झाली आहे. गुन्हेगार व चाेरटे अंधाराचा फायदा घेत महिलांच्या अंगावरील व बॅगेतील दागिने चाेरून नेण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाने शहरातील बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने सुरू करावे, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे.

...

डाेळे दिपणारा प्रकाश

हा राष्ट्रीय महामार्ग २४ तास वर्दळीचा आहे. यावरून धावणारी बहुतांश वाहने भरधाव असतात. वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशझाेतामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांचे डाेळे दिपतात. अशावेळी वाहनावरील ताबा सुटून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामठी शहर गुन्हेगारीमध्ये आधीच संवेदनशील आहे. अंधारामुळे शहरात गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांचा वावरही वाढला आहे.