लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : नागपूर-जबलपूर (मध्य प्रदेश) हा राष्ट्रीय महामार्ग कामठी शहराच्या मध्यभागातून गेला आहे. शहरात या मार्गाच्या दुभाजकावर ठिकठिकाणी पथदिवे लावले आहेत. मात्र, हे पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने त्याचा उपयाेग काय, असा प्रश्न कामठीवासीयांनी उपस्थित केला आहे. रात्रीच्यावेळी हा संपूर्ण महामार्ग अंधारात राहात असल्याने नागरिकांना राेज विविध समस्यांना ताेंड द्यावे लागते.
या राष्ट्रीय महामार्गावर कामठी शहरातील गरूड चौकापासून कमसरी बाजारापर्यंत, तसेच शहरातील मुख्य मार्गावरील जयस्तंभ चौक ते शुक्रवारी बाजार, पोलीस लाईन, मेन रोड, राम मंदिर चौकापर्यंत ठिकठिकाणी पथदिवे लावण्यात आले आहेत. या दाेन्ही मार्गाला दुभाजक असून, त्यावरील पथदिवे महिनाभरापासून बंद आहेत.
सध्या श्रीगणेश उत्सव सुरू असून, यावर्षी शहरात ५३ सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. काेराेना संक्रमण कमी झाल्याने आधीच राेडवरील वर्दळ वाढली हाेती. त्यातच शहरातील बहुतांश नागरिक रात्रीच्या वेळी कुटुंबीयांसह गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जातात. त्यामुळे राेडवरील गर्दीत वाढ झाली आहे. गुन्हेगार व चाेरटे अंधाराचा फायदा घेत महिलांच्या अंगावरील व बॅगेतील दागिने चाेरून नेण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाने शहरातील बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने सुरू करावे, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे.
...
डाेळे दिपणारा प्रकाश
हा राष्ट्रीय महामार्ग २४ तास वर्दळीचा आहे. यावरून धावणारी बहुतांश वाहने भरधाव असतात. वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशझाेतामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांचे डाेळे दिपतात. अशावेळी वाहनावरील ताबा सुटून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामठी शहर गुन्हेगारीमध्ये आधीच संवेदनशील आहे. अंधारामुळे शहरात गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांचा वावरही वाढला आहे.