शहरं
Join us  
Trending Stories
1
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
3
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
4
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
5
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
6
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
7
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
8
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
9
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
10
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
11
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
12
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
13
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
14
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
15
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
16
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
17
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
18
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
19
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
20
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दलित, देशीवाद ही मराठी साहित्याची भारतीय साहित्यविश्वाला देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विसाव्या शतकात मराठी साहित्यविश्वात सैद्धांतिक घटनांची नोंद फार उणिवेने आहे. पोटवाद, तृष्णावाद व देशीवाद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विसाव्या शतकात मराठी साहित्यविश्वात सैद्धांतिक घटनांची नोंद फार उणिवेने आहे. पोटवाद, तृष्णावाद व देशीवाद हे तीनच टप्पे मराठीत दिसतात. मात्र, देणगीच्या बाबतीत म्हणाल तर मराठी साहित्याकडून भारतीय साहित्यविश्वाला दलित व देशीवाद ही मोठी देणगी असल्याचे मत प्रसिद्ध साहित्यिक व साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य राजन गवस यांनी व्यक्त केले.

साहित्य अकादमी, मुंबईच्या वतीने विसाव्या शतकातील मराठी साहित्यावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन सल्लागार मंडळाचे सदस्य व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. प्रमोद मुनघाटे, रंगनाथ पठारे, साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने उपस्थित होते.

विसाव्या शतकापूर्वी गद्य साहित्याचा धाक निर्माण होण्यात स्वातंत्र्य क्रांतीचा ध्यास होता. त्यातून विसाव्या शतकात प्रवेश करताना कथाकार वर्ग निर्माण झाला आणि त्यांनी अधिराज्य गाजवले. मात्र, बेसुमारता प्रकर्षाने जाणवायला लागली. त्यांच्याच कोडकौतुकात वाङमयीन जीवन खर्ची गेल्याचे दिसते. त्यानंतर १९६० पासून मराठी साहित्यात कादंबरी, कवितांची घुसळण झाली. दलित साहित्यातून वेदना केंद्रस्थानी राहिल्या. हा काळ आत्मकथनांनी व्यापला होता. मात्र, या काळात साहित्याचा कोणताही प्रकार समाजमनावर प्रभाव टाकेनासा होता आणि आहे. समाजमनाला प्रतिक्रिया न देण्याच्या या प्रकारामुळे साहित्याचा समाजमनावरील प्रभाव ओसरत गेल्याचे राजन गवस म्हणाले. प्रा. प्रमोद मुनघाटे यांचे बिजभाषण झाले.

वाङ्मयातील संकुचितता संपावी

विसाव्या शतकात पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर नीतिमूल्ये ढासळल्याचे प्रकर्षाने जाणवायला लागले आणि मराठी साहित्यात डाव्या विचारांचे प्राबल्य वाढले. याच काळानंतर दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्याने उचल खाल्ली. मात्र, या साहित्यविश्वाला पुढे नेणारा कुणी सापडला नाही. आता त्याला खतपाणी दिले जात असले तरी तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद फुटकळ असल्याने, साहित्यातील संकुचितता संपली पाहिजे, असे सदानंद मोरे उद्घाटन भाषणात म्हणाले.