शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दलित, देशीवाद ही मराठी साहित्याची भारतीय साहित्यविश्वाला देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विसाव्या शतकात मराठी साहित्यविश्वात सैद्धांतिक घटनांची नोंद फार उणिवेने आहे. पोटवाद, तृष्णावाद व देशीवाद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विसाव्या शतकात मराठी साहित्यविश्वात सैद्धांतिक घटनांची नोंद फार उणिवेने आहे. पोटवाद, तृष्णावाद व देशीवाद हे तीनच टप्पे मराठीत दिसतात. मात्र, देणगीच्या बाबतीत म्हणाल तर मराठी साहित्याकडून भारतीय साहित्यविश्वाला दलित व देशीवाद ही मोठी देणगी असल्याचे मत प्रसिद्ध साहित्यिक व साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य राजन गवस यांनी व्यक्त केले.

साहित्य अकादमी, मुंबईच्या वतीने विसाव्या शतकातील मराठी साहित्यावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन सल्लागार मंडळाचे सदस्य व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. प्रमोद मुनघाटे, रंगनाथ पठारे, साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने उपस्थित होते.

विसाव्या शतकापूर्वी गद्य साहित्याचा धाक निर्माण होण्यात स्वातंत्र्य क्रांतीचा ध्यास होता. त्यातून विसाव्या शतकात प्रवेश करताना कथाकार वर्ग निर्माण झाला आणि त्यांनी अधिराज्य गाजवले. मात्र, बेसुमारता प्रकर्षाने जाणवायला लागली. त्यांच्याच कोडकौतुकात वाङमयीन जीवन खर्ची गेल्याचे दिसते. त्यानंतर १९६० पासून मराठी साहित्यात कादंबरी, कवितांची घुसळण झाली. दलित साहित्यातून वेदना केंद्रस्थानी राहिल्या. हा काळ आत्मकथनांनी व्यापला होता. मात्र, या काळात साहित्याचा कोणताही प्रकार समाजमनावर प्रभाव टाकेनासा होता आणि आहे. समाजमनाला प्रतिक्रिया न देण्याच्या या प्रकारामुळे साहित्याचा समाजमनावरील प्रभाव ओसरत गेल्याचे राजन गवस म्हणाले. प्रा. प्रमोद मुनघाटे यांचे बिजभाषण झाले.

वाङ्मयातील संकुचितता संपावी

विसाव्या शतकात पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर नीतिमूल्ये ढासळल्याचे प्रकर्षाने जाणवायला लागले आणि मराठी साहित्यात डाव्या विचारांचे प्राबल्य वाढले. याच काळानंतर दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्याने उचल खाल्ली. मात्र, या साहित्यविश्वाला पुढे नेणारा कुणी सापडला नाही. आता त्याला खतपाणी दिले जात असले तरी तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद फुटकळ असल्याने, साहित्यातील संकुचितता संपली पाहिजे, असे सदानंद मोरे उद्घाटन भाषणात म्हणाले.