शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

आश्वासनांपेक्षा स्वस्त दरात डाळ वाटा

By admin | Updated: October 22, 2016 02:37 IST

गेल्या दोन वर्षापासून डाळींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या काळात परत भाववाढ वाढ होत आहे.

डाळींवरून देशमुखांचा बापटांवर नेम : भाव नियंत्रित ठेवण्यात अपयशीनागपूर : गेल्या दोन वर्षापासून डाळींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या काळात परत भाववाढ वाढ होत आहे. यामुळे या काळात सामान्य नागरिकांच्या ताटातून डाळ हद्दपार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी मंत्री गिरीश बापट हे जबाबदार आहेत, अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी नेम साधल्यामुळे ऐन दिवाळीत पुन्हा एकदा डाळीला तडका मिळण्याची शक्यता आहे. देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिवाळीत ग्राहकांना माफक दरात डाळी उपलब्ध झाल्या नाही तर आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असतानाही डाळींच्या किमती वाढल्या होत्या. यावर तोडगा काढत केंद्र सरकारकडुन व इतर राज्यातुन जवळपास ५० हजार मेट्रिक टन डाळ आयात करुन ती राज्यभरातील रेशन दुकानाच्या माध्यमातुन उपलब्ध करून दिली होती. सवलतीच्या दरात डाळ ही योजना यशस्वीपणे राबविली होती. शिवाय याच काळात गरिबांना दिवाळीत पाम तेल हे ४५ रुपये किलो प्रमाणे दिले होते, याची आठवण देशमुख यांनी बापट यांना करून दिली आहे. सणासुदीचा काळ असताना बापट यांनी फक्त ७०० मेट्रिक टन डाळीची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यात डाळींची मागणी यापेक्षाही मोठी आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बापट हे कोणतेही ठोस प्रयत्न करताना दिसत नाही. आश्वासनाची खैरात वाटण्यापेक्षा रेशन दुकानातून स्वस्त दरात तूर डाळ वाटण्याचे काम त्यांनी करावे अशी खोचक टीकाही देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवळपास १ कोटी ७७ लाख हे एपीएल म्हणजेच केशरी कार्ड धारक आहेत. आपण या खात्याचा मंत्री असतांना या कार्डधारकांना १० किलो गहू व ५ किलो तांदूळ असे १५ किलो धान्य हे सवलतीच्या दरात देण्यात येत होते. परंतु बापट मंत्री होताच केशरी कार्ड धारकांना मिळणारे सवलतीच्या दारातील हे धान्य देणे बंद करण्यात आले. यामुळे राज्यातील १ कोटी ७७ लाख कुटुंबाच्या तोंडचा घास हिरावला आहे. हेच सामान्य नागरिकांचे अच्छे दिन का, असा टोलाही देशमुख यांनी बापट यांना लगावला आहे.(प्रतिनिधी)