शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

आश्वासनांपेक्षा स्वस्त दरात डाळ वाटा

By admin | Updated: October 22, 2016 02:37 IST

गेल्या दोन वर्षापासून डाळींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या काळात परत भाववाढ वाढ होत आहे.

डाळींवरून देशमुखांचा बापटांवर नेम : भाव नियंत्रित ठेवण्यात अपयशीनागपूर : गेल्या दोन वर्षापासून डाळींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या काळात परत भाववाढ वाढ होत आहे. यामुळे या काळात सामान्य नागरिकांच्या ताटातून डाळ हद्दपार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी मंत्री गिरीश बापट हे जबाबदार आहेत, अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी नेम साधल्यामुळे ऐन दिवाळीत पुन्हा एकदा डाळीला तडका मिळण्याची शक्यता आहे. देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिवाळीत ग्राहकांना माफक दरात डाळी उपलब्ध झाल्या नाही तर आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असतानाही डाळींच्या किमती वाढल्या होत्या. यावर तोडगा काढत केंद्र सरकारकडुन व इतर राज्यातुन जवळपास ५० हजार मेट्रिक टन डाळ आयात करुन ती राज्यभरातील रेशन दुकानाच्या माध्यमातुन उपलब्ध करून दिली होती. सवलतीच्या दरात डाळ ही योजना यशस्वीपणे राबविली होती. शिवाय याच काळात गरिबांना दिवाळीत पाम तेल हे ४५ रुपये किलो प्रमाणे दिले होते, याची आठवण देशमुख यांनी बापट यांना करून दिली आहे. सणासुदीचा काळ असताना बापट यांनी फक्त ७०० मेट्रिक टन डाळीची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यात डाळींची मागणी यापेक्षाही मोठी आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बापट हे कोणतेही ठोस प्रयत्न करताना दिसत नाही. आश्वासनाची खैरात वाटण्यापेक्षा रेशन दुकानातून स्वस्त दरात तूर डाळ वाटण्याचे काम त्यांनी करावे अशी खोचक टीकाही देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवळपास १ कोटी ७७ लाख हे एपीएल म्हणजेच केशरी कार्ड धारक आहेत. आपण या खात्याचा मंत्री असतांना या कार्डधारकांना १० किलो गहू व ५ किलो तांदूळ असे १५ किलो धान्य हे सवलतीच्या दरात देण्यात येत होते. परंतु बापट मंत्री होताच केशरी कार्ड धारकांना मिळणारे सवलतीच्या दारातील हे धान्य देणे बंद करण्यात आले. यामुळे राज्यातील १ कोटी ७७ लाख कुटुंबाच्या तोंडचा घास हिरावला आहे. हेच सामान्य नागरिकांचे अच्छे दिन का, असा टोलाही देशमुख यांनी बापट यांना लगावला आहे.(प्रतिनिधी)