शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे

By admin | Updated: December 26, 2014 00:48 IST

ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी ग्राहक संघटनांनी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी केले.

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादननागपूर : ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी ग्राहक संघटनांनी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी केले.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक हितासंदर्भातील विषयावर सरपंच भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाचे अध्यक्ष मनोहर चिलबुले, प्रमुख अतिथी म्हणून पुरवठा विभागाचे उपायुक्त रमेश मावस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश वंजारी, अन्नधान्य वितरण अधिकारी रमेश बेंडे आणि लीलाधर वार्डेधर व्यासपीठावर उपस्थित होते. ग्राहकांचे हित सांभाळताना त्यांना कसा न्याय देता येईल, याचा विचार आवश्यक आहे. ग्राहक चळवळ पुढे नेण्यासाठी त्यावर विचारमंथन झाले तरच ग्राहक दिन साजरा करण्याचे औचित्य साध्य होईल. आता काळानुरूप ग्राहकांमध्ये प्रचंड बदल झाला आहे. आता ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकारामध्येही बदल झाला असून, आॅनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. त्यासाठी ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध ध्येधोरणे, सूचना, अभिप्राय, उपाययोजना येणे अपेक्षत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उमरेड येथील लोकमान्य क्रिएशन्सकडून ग्राहकांच्या हितावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा सुरूवात झाली. संचालन जी.डी. निशनकर यांनी तर आभार रमेश बेंडे यांनी मानले. यावेळी विभागाचे अधिकारी, विविध ग्राहक संरक्षण संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)