शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आठवडी बाजारात ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क केळवद : काेराेना संक्रमणाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ मार्चपर्यंत आठवडी बाजारांवर बंदी घातली आहे; मात्र ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

केळवद : काेराेना संक्रमणाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ मार्चपर्यंत आठवडी बाजारांवर बंदी घातली आहे; मात्र केळवद (ता. सावनेर) येथे गुरुवारी (दि. २५) भरलेल्या आठवडी बाजारात ग्राहकांनी भाजीपाला व इतर गृहाेपयाेगी साहित्य खरेदी करण्यासाठी माेठी गर्दी केली हाेती. ग्राहकांमध्ये मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचा माेठा अभाव दिसून आल्याने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचा फज्जा उडाला हाेता.

केळवद येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात परिसरातील लगेच लगतच्या मध्य प्रदेशातील गावांमधील नागरिक खरेदीसाठी तर नागपूर, सावनेर यांसह अन्य शहरे व गावांमधील दुकानदार व व्यापारी भाजीपाल्यासह अन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी नियमित येतात. केळवद येथील आठवडी बाजार प्रशस्त मैदानावर भरत नसून, ताे गावातील राेडलगत भरताे. गावातील राेड अरुंद असल्याने राेडलगतची दुकाने आणि खरेदीसाठी आलेले ग्राहक यांची चांगलीच गर्दी हाेते. या गर्दीतून पायी वाट करणे मुश्कील असते.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काही काळ आठवडी बाजारावर बंदी घातली असताना केळवद येथील आठवडी बाजार भरला हाेता. बाजारात आलेले बहुतांश दुकानदार व ग्राहक विना मास्क फिरत हाेेते. फिजिकल डिस्टन्सिंगचा थांगपत्ता नव्हता. बाजारात आलेल्या व्यक्तींपैकी काेण काेराेना पाॅझिटिव्ह आणि काेण निगेटिव्ह, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे बाजारातील गर्दी व नागरिकांचा हलगर्जीपणा काेराेनाच्या संक्रमणास कारणीभूत ठरू शकताे, अशी शक्यताही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली.

...

१४ जणांना काेराेनाची लागण

केळवद प्राथमिक आराेग्य केंद्रात राेज काेराेनाची टेस्ट केली जात आहे. या प्राथमिक आराेग्य केंद्राच्या हद्दीतील गावांमध्ये १८ ते २५ फेब्रुवारी या काळात १४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे त्यांच्या टेस्टवरून स्पष्ट झाले आहे. यात १३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यावर औषधाेपचार सुरू करण्यात आला असून, त्यांना गृह विलिगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशाेर गजभिये यांनी दिली. दुसरीकडे, काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच गीतांजली वानखेडे, उपसरपंच सुधाकर बाेंद्रे, ठाणेदार दिलीप राठाेड, ग्रामसेवक साेमकुवर यांनी केले आहे.

...

जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजारांवर काही काळ बंदी घातली आहे. केळवद येथील बाजार आणि त्यातील नागरिकांची गर्दी पाहता, ग्रामपंचायतचे सचिव साेमकुवर यांच्याशी फाेनवर वारंवार संपर्क साधला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय, संपर्कही केला नाही. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी गंभीर बाब आहे.

- दिलीप ठाकूर, ठाणेदार,

केळवद, ता. सावनेर.