शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

कोंढाळीतील बाजारात ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काेंढाळी येथील बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहक राेज गर्दी करीत असल्याने काेंढाळीची हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच काेंढाळी येथील बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याने पाेलिसांनी मंगळवारी (दि. ४) सकाळी पाच दुकानदारांविरुद्ध गुन्हे नाेंदविले. विशेष म्हणजे, यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार नाेंदविली हाेती.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी व संचारबंदीचा निर्णय घेत औषधांची दुकाने वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू व नंतर दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काेंढाळी येथील बाजार चाैक व मेन राेडवर किराणा, बेकरी व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत. याच मार्गावर राेज भाजीपाला विक्रेते त्यांची दुकाने थाटतात. ही दुकाने किराणा, बेकरीसमाेर किंवा बाजूला थाटलेली असल्याने तसेच हा मार्ग अरुंद असल्याने तेथे ग्राहकांची माेठी गर्दी हाेते. परिणामी, या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जाते.

दरम्यान, बाजारातील ही गर्दी धाेकादायक असल्याने तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने उघडी ठेवण्यात आल्याने ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी पाेलिसांना माहिती दिली. त्याअनुषंगाने पाेलिसांनी बाजाराची पाहणी करीत शेख नदीम युनूस मेमन (३१), गफार अब्दुल करीम मुसानी (४०), विकास जिनेश्वर उमाठे (५६), शेख ताजमिर (५०) व मोहम्मद सौफियान कुद्दुस मुसानी (२५) या पाच दुकानदारांविरुद्ध अधिक काळ दुकाने सुरू ठेवल्याने भादंवि १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा नाेंदविला, अशी माहिती ठाणेदार यांनी दिली.

...

दुकानांची वेळ दुपारी १ पर्यंत करा

ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाल्याची दुकाने थाटण्यासाठी नवीन आठवडी बाजारात व्यवस्था केली आहे. मात्र, भाजीपाला विक्रेते त्या जागेवर कमी आणि मुख्य मार्गालगत अधिक दुकाने थाटतात. त्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सकाळी ७ वाजता बाजारात दुकाने थाटणे किंवा उघडणे तसेच खरेदीसाठी बाजारात येणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ही वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करावी, अशी मागणीही केली जात आहे.