शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोंढाळीतील बाजारात ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काेंढाळी येथील बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहक राेज गर्दी करीत असल्याने काेंढाळीची हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच काेंढाळी येथील बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याने पाेलिसांनी मंगळवारी (दि. ४) सकाळी पाच दुकानदारांविरुद्ध गुन्हे नाेंदविले. विशेष म्हणजे, यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार नाेंदविली हाेती.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी व संचारबंदीचा निर्णय घेत औषधांची दुकाने वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू व नंतर दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काेंढाळी येथील बाजार चाैक व मेन राेडवर किराणा, बेकरी व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत. याच मार्गावर राेज भाजीपाला विक्रेते त्यांची दुकाने थाटतात. ही दुकाने किराणा, बेकरीसमाेर किंवा बाजूला थाटलेली असल्याने तसेच हा मार्ग अरुंद असल्याने तेथे ग्राहकांची माेठी गर्दी हाेते. परिणामी, या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जाते.

दरम्यान, बाजारातील ही गर्दी धाेकादायक असल्याने तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने उघडी ठेवण्यात आल्याने ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी पाेलिसांना माहिती दिली. त्याअनुषंगाने पाेलिसांनी बाजाराची पाहणी करीत शेख नदीम युनूस मेमन (३१), गफार अब्दुल करीम मुसानी (४०), विकास जिनेश्वर उमाठे (५६), शेख ताजमिर (५०) व मोहम्मद सौफियान कुद्दुस मुसानी (२५) या पाच दुकानदारांविरुद्ध अधिक काळ दुकाने सुरू ठेवल्याने भादंवि १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा नाेंदविला, अशी माहिती ठाणेदार यांनी दिली.

...

दुकानांची वेळ दुपारी १ पर्यंत करा

ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाल्याची दुकाने थाटण्यासाठी नवीन आठवडी बाजारात व्यवस्था केली आहे. मात्र, भाजीपाला विक्रेते त्या जागेवर कमी आणि मुख्य मार्गालगत अधिक दुकाने थाटतात. त्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सकाळी ७ वाजता बाजारात दुकाने थाटणे किंवा उघडणे तसेच खरेदीसाठी बाजारात येणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ही वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करावी, अशी मागणीही केली जात आहे.