शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कोंढाळीतील बाजारात ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काेंढाळी येथील बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहक राेज गर्दी करीत असल्याने काेंढाळीची हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच काेंढाळी येथील बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याने पाेलिसांनी मंगळवारी (दि. ४) सकाळी पाच दुकानदारांविरुद्ध गुन्हे नाेंदविले. विशेष म्हणजे, यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार नाेंदविली हाेती.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी व संचारबंदीचा निर्णय घेत औषधांची दुकाने वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू व नंतर दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काेंढाळी येथील बाजार चाैक व मेन राेडवर किराणा, बेकरी व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत. याच मार्गावर राेज भाजीपाला विक्रेते त्यांची दुकाने थाटतात. ही दुकाने किराणा, बेकरीसमाेर किंवा बाजूला थाटलेली असल्याने तसेच हा मार्ग अरुंद असल्याने तेथे ग्राहकांची माेठी गर्दी हाेते. परिणामी, या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जाते.

दरम्यान, बाजारातील ही गर्दी धाेकादायक असल्याने तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने उघडी ठेवण्यात आल्याने ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी पाेलिसांना माहिती दिली. त्याअनुषंगाने पाेलिसांनी बाजाराची पाहणी करीत शेख नदीम युनूस मेमन (३१), गफार अब्दुल करीम मुसानी (४०), विकास जिनेश्वर उमाठे (५६), शेख ताजमिर (५०) व मोहम्मद सौफियान कुद्दुस मुसानी (२५) या पाच दुकानदारांविरुद्ध अधिक काळ दुकाने सुरू ठेवल्याने भादंवि १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा नाेंदविला, अशी माहिती ठाणेदार यांनी दिली.

...

दुकानांची वेळ दुपारी १ पर्यंत करा

ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाल्याची दुकाने थाटण्यासाठी नवीन आठवडी बाजारात व्यवस्था केली आहे. मात्र, भाजीपाला विक्रेते त्या जागेवर कमी आणि मुख्य मार्गालगत अधिक दुकाने थाटतात. त्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सकाळी ७ वाजता बाजारात दुकाने थाटणे किंवा उघडणे तसेच खरेदीसाठी बाजारात येणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ही वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करावी, अशी मागणीही केली जात आहे.