शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

पीक कापणी प्रयोगाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

रामटेक : यंदा खरीप आणि रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. मात्र पारंपरिक उंबरठा उत्पादन ...

रामटेक : यंदा खरीप आणि रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. मात्र पारंपरिक उंबरठा उत्पादन पद्धतीने आणि पीक कापणी प्रयोगानंतर शासनाकडे सादर करण्यात येत असलेल्या आकडेवारीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. याचा फायदा विमा कंपन्यांना अधिक होतो, असा आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आता या पारंपरिक पद्धतीत बदल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी स्थानिक प्रशासनाकडून केल्या जाते. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाते. तसेच पीक कापणी प्रयोगांतर्गत शासनाने निर्धारित केलेले उंबरठा उत्पादन मोजण्याकरिता मंडळनिहाय प्लॉट पाडण्यात येतात. या प्लॉटवर आलेल्या उत्पादनाची आकडेवारी या सर्व अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर असते. त्यामुळे हे अधिकारी तसेच जर का विमा कंपन्यांसोबत हातमिळवणी करीत असतील तर शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जाणीवपूर्वक विमा कंपनीला फायदा व्हावा अशाप्रकारची आकडेवारी या तिन्ही विभागाच्या माध्यमातून शासनाला पुरविली जाते. प्रसंगी शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. त्यामुळे कृषी आयुक्तालयाकडून मंडळनिहाय उंबरठा उत्पादनाचे प्लॉट दुप्पट करण्यात यावे.

काय करावे लागेल

- पीक कापणी प्रयोगांतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या प्लॉटवर असलेल्या पिकाच्या कापणीचा व्हिडिओ तसेच उत्पादन हाती कसे आले व किती आले, याचे मोजमाप करीत असतानाचा व्हिडिओ घेण्यात यावा. संबंधित शेतकरी व त्या गावातील किमान पाच नागरिक हे सर्व करीत असताना त्या व्हिडिओमध्ये दिसावेत. हा व्हिडिओ प्रत्येक मंडळातील निर्धारित केलेल्या अधिकाऱ्यामार्फत त्यांच्या विभागाच्या व प्लॉटच्या माहितीसह शासकीय संकेतस्थळावर टाकण्यात यावा. त्यामुळे पीक कापणी प्रयोग प्रामाणिकपणे केला गेला, असा सिद्ध होईल.

- सध्या होत असलेली पीक कापणी प्रयोग हा अंदाजे होत असून विमा कंपन्यांचा फायदा होईल, या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक केला जात आहे. त्यामुळे शेतकरी राज्य सरकार आणि विमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहत आहेत.

---

शेतकऱ्यांना यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. असे असतानासुद्धा शासकीय आकडेवारीमध्ये शेतकरी शासकीय तसेच विमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहत आहेत. यावर शासनाने विशेष समिती स्थापन करून शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावा.

- डॉ. राजेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष, ग्रामविकास आघाडी, भाजपा