शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पीक कापणी प्रयोगाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

रामटेक : यंदा खरीप आणि रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. मात्र पारंपरिक उंबरठा उत्पादन ...

रामटेक : यंदा खरीप आणि रबी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. मात्र पारंपरिक उंबरठा उत्पादन पद्धतीने आणि पीक कापणी प्रयोगानंतर शासनाकडे सादर करण्यात येत असलेल्या आकडेवारीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. याचा फायदा विमा कंपन्यांना अधिक होतो, असा आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आता या पारंपरिक पद्धतीत बदल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी स्थानिक प्रशासनाकडून केल्या जाते. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाते. तसेच पीक कापणी प्रयोगांतर्गत शासनाने निर्धारित केलेले उंबरठा उत्पादन मोजण्याकरिता मंडळनिहाय प्लॉट पाडण्यात येतात. या प्लॉटवर आलेल्या उत्पादनाची आकडेवारी या सर्व अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर असते. त्यामुळे हे अधिकारी तसेच जर का विमा कंपन्यांसोबत हातमिळवणी करीत असतील तर शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जाणीवपूर्वक विमा कंपनीला फायदा व्हावा अशाप्रकारची आकडेवारी या तिन्ही विभागाच्या माध्यमातून शासनाला पुरविली जाते. प्रसंगी शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. त्यामुळे कृषी आयुक्तालयाकडून मंडळनिहाय उंबरठा उत्पादनाचे प्लॉट दुप्पट करण्यात यावे.

काय करावे लागेल

- पीक कापणी प्रयोगांतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या प्लॉटवर असलेल्या पिकाच्या कापणीचा व्हिडिओ तसेच उत्पादन हाती कसे आले व किती आले, याचे मोजमाप करीत असतानाचा व्हिडिओ घेण्यात यावा. संबंधित शेतकरी व त्या गावातील किमान पाच नागरिक हे सर्व करीत असताना त्या व्हिडिओमध्ये दिसावेत. हा व्हिडिओ प्रत्येक मंडळातील निर्धारित केलेल्या अधिकाऱ्यामार्फत त्यांच्या विभागाच्या व प्लॉटच्या माहितीसह शासकीय संकेतस्थळावर टाकण्यात यावा. त्यामुळे पीक कापणी प्रयोग प्रामाणिकपणे केला गेला, असा सिद्ध होईल.

- सध्या होत असलेली पीक कापणी प्रयोग हा अंदाजे होत असून विमा कंपन्यांचा फायदा होईल, या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक केला जात आहे. त्यामुळे शेतकरी राज्य सरकार आणि विमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहत आहेत.

---

शेतकऱ्यांना यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. असे असतानासुद्धा शासकीय आकडेवारीमध्ये शेतकरी शासकीय तसेच विमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहत आहेत. यावर शासनाने विशेष समिती स्थापन करून शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावा.

- डॉ. राजेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष, ग्रामविकास आघाडी, भाजपा