शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

By admin | Updated: May 4, 2017 01:51 IST

उपराजधानीतील गुन्ह्यांवर नियंत्रण आले असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांकडूनदेखील वारंवार करण्यात आला आहे.

३ महिन्यांत २३ हत्या  गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कुठे कमी झाले ? नागपूरकर किती सुरक्षित ? नागपूर : उपराजधानीतील गुन्ह्यांवर नियंत्रण आले असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांकडूनदेखील वारंवार करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात २०१६ च्या तुलनेत २०१७ च्या पहिल्या तीन महिन्यांत गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात फारशी घट झालेली नाही. हत्या, चोरी, अपहरण, दरोडे यासारखे गुन्हे वाढीस लागले आहे. माहितीच्या अधिकारातून अधिकाऱ्यांच्या दाव्यांमधील फोलपणा समोर आला आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहरातील गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत नागपूर शहरात किती गुन्हे झाले, हत्या-बलात्कार-चोरी यांचे प्रमाण किती होते, अंमली पदार्थांचा किती साठा सापडला, सायबर क्राईमचे प्रमाण किती होते, जुगार खेळणाऱ्यांवरील कारवाईचे प्रमाण इत्यादी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत २,३८९ गुन्हे दाखल झाले होते. तर या वर्षात हे प्रमाण २,३५१ इतके आहे. या तीन महिन्यांतील एकूण गुन्हे अवघ्या ३८ ने घटले असले तरी गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे. यंदा तीन महिन्यांत शहरात २३ हत्या झाल्या. मागील वर्षी हाच आकडा १७ इतका होता. २०१६ मध्ये बलात्कारांच्या प्रकरणांची संख्या ३२ होती व यावर्षी ती संख्या ४१ वर पोहोचली आहे. छेडखानी करताना यंदा ७६७ जणांवर कारवाई करण्यात आली. ‘क्राईम ग्राफ’ वाढतोय... ‘सायबर क्राईम’अंतर्गत २०१६ या संपूर्ण वर्षात ९६ गुन्हे दाखल झाले होते. यंदा मार्च महिन्यापर्यंत २८ गुन्ह्यांची नोंद झाली. चोरी, दरोडे, अपहरणदेखील वाढीस २०१६ व २०१७ मधील पहिल्या तीन वर्षांतील चोरी, दरोडे व अपहरणाच्या घटनांची आकडेवारीदेखील वाढलेली आहे. २०१६ मध्ये चोरी, दरोडे व अपहरणाची अनुक्रमे ७६४, ५३ व १०३ प्रकरणांची नोंद झाली होती. २०१७ मध्ये हीच संख्या अनुक्रमे ७७६ (१२ ने वाढ), ७६ (२३ ने वाढ) व ११९ (१६ ने वाढ) इतकी झाली आहे. चेनस्नॅचिंग व फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ११ व ३ प्रकरणांनी घट झाली आहे. ‘सायबर क्राईम’अंतर्गत २०१६ या संपूर्ण वर्षात ९६ गुन्हे दाखल झाले होते. यंदा मार्च महिन्यापर्यंत २८ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१६ व २०१७ मधील पहिल्या तीन वर्षांतील चोरी, दरोडे व अपहरणाच्या घटनांची आकडेवारीदेखील वाढलेली आहे. २०१६ मध्ये चोरी, दरोडे व अपहरणाची अनुक्रमे ७६४, ५३ व १०३ प्रकरणांची नोंद झाली होती. २०१७ मध्ये हीच संख्या अनुक्रमे ७७६ (१२ ने वाढ), ७६ (२३ ने वाढ) व ११९ (१६ ने वाढ) इतकी झाली आहे. चेनस्नॅचिंग व फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ११ व ३ प्रकरणांनी घट झाली आहे.