शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही : न्या. रवी देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:27 IST

न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देवकिलांना इंग्रजी शिकून घेण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत ‘असा मी घडलो’ या शीर्षकाखाली उच्च न्यायालयाच्या सभागृहामध्ये ही मुलाखत घेण्यात आली. एका प्रश्नाचे उत्तर देताना न्या. देशपांडे यांनी न्यायालयाच्या कामकाजाची भाषा मराठी करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. न्यायालयाचे कामकाज मराठीमध्ये केले जाऊ शकत नाही. तसे करणे प्रत्येकासाठी गैरसोयीचे होईल. एखाद्यास काही बाबतीत इंग्रजीमध्ये बोलणेअवघड वाटल्यास त्याला मराठी भाषा वापरण्याची परवानगी दिली जाते. परंतु, पूर्णपणे मराठीमध्ये कामकाज करणे अशक्य आहे असे त्यांनी सांगितले.वकिलीपेक्षा न्यायदानाचे कार्य करणे कठीण आहे. न्यायदान करताना दोन्ही बाजूने समन्वय ठेवावा लागतो. सुनावणीमध्ये पुढे न आलेली महत्त्वाची बाजू तपासून पहावी लागते. न्यायदानावर न्यायमूर्तींच्या वैयक्तिक दृष्टिकोनाचाही फार मोठा परिणाम पडतो. वकिलांनी स्वत:च्या बाजूने निकाल लागण्यासाठी आग्रही न राहता स्वत:ची कामगिरी कशी गुणवत्तापूर्ण होईल यावर जास्त भर द्यायला पाहिजे. स्वत:ची कामगिरी उच्च दर्जाची राहिल्यास निकाल आपोआप आपल्या बाजूने लागतो. वकिलांनी नेहमी सर्वप्रथम पक्षकारांची व्यथा समजून घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे कशी मांडायची यावर परिश्रम घ्यावे अशी सूचना न्या. देशपांडे यांनी केली.लहानपणी शिक्षणात मुळीच रुची नव्हती. शिक्षणबाह्य बाबींवर जास्त भर देत होतो. त्यामुळे शिक्षणात गती नव्हती. इयत्ता तिसरीमध्ये नापास झालो होतो. शालेय शिक्षण मराठीत झाले. परिणामी, पुढे चालून इंग्रजीची मोठी समस्या उभी राहिली. त्यावर परिश्रमाने मात करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. वकिली व्यवसायात आल्यानंतर इतर सर्व गोष्टी बाजूला पडल्या. स्वत:ला पूर्णपणे वकिली व्यवसायात झोकून दिले. २५ वर्षे वकिली केल्यानंतर न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. तेव्हापर्यंत न्यायमूर्ती होण्याचा विचार मनात आला नव्हता अशी माहिती न्या. देशपांडे यांनी यावेळी दिली. त्यांचे बालमित्र अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी यांनी मुलाखतीचे संचालन केले. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नागपूरने घडविलेआपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व येथील सहकाऱ्यांनी घडविले. आपल्या यशामध्ये या दोघांचा मोठा वाटा आहे. मुंबई व औरंगाबाद येथील लोकांनी कितीही प्रशंसा केली तरी, कार्य करण्याचे खरे समाधान नागपूर खंडपीठातच आहे. आपल्या लोकांसोबत काम करण्यामध्ये नेहमीच आनंद वाटतो अशा भावना न्या. देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarathiमराठी