शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही : न्या. रवी देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:27 IST

न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देवकिलांना इंग्रजी शिकून घेण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाचे कामकाज मराठीत करण्याची गरज नाही. त्याऐवजी वकिलांनी इंग्रजी शिकून घ्यावी असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी बुधवारी प्रगट मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत ‘असा मी घडलो’ या शीर्षकाखाली उच्च न्यायालयाच्या सभागृहामध्ये ही मुलाखत घेण्यात आली. एका प्रश्नाचे उत्तर देताना न्या. देशपांडे यांनी न्यायालयाच्या कामकाजाची भाषा मराठी करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. न्यायालयाचे कामकाज मराठीमध्ये केले जाऊ शकत नाही. तसे करणे प्रत्येकासाठी गैरसोयीचे होईल. एखाद्यास काही बाबतीत इंग्रजीमध्ये बोलणेअवघड वाटल्यास त्याला मराठी भाषा वापरण्याची परवानगी दिली जाते. परंतु, पूर्णपणे मराठीमध्ये कामकाज करणे अशक्य आहे असे त्यांनी सांगितले.वकिलीपेक्षा न्यायदानाचे कार्य करणे कठीण आहे. न्यायदान करताना दोन्ही बाजूने समन्वय ठेवावा लागतो. सुनावणीमध्ये पुढे न आलेली महत्त्वाची बाजू तपासून पहावी लागते. न्यायदानावर न्यायमूर्तींच्या वैयक्तिक दृष्टिकोनाचाही फार मोठा परिणाम पडतो. वकिलांनी स्वत:च्या बाजूने निकाल लागण्यासाठी आग्रही न राहता स्वत:ची कामगिरी कशी गुणवत्तापूर्ण होईल यावर जास्त भर द्यायला पाहिजे. स्वत:ची कामगिरी उच्च दर्जाची राहिल्यास निकाल आपोआप आपल्या बाजूने लागतो. वकिलांनी नेहमी सर्वप्रथम पक्षकारांची व्यथा समजून घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे कशी मांडायची यावर परिश्रम घ्यावे अशी सूचना न्या. देशपांडे यांनी केली.लहानपणी शिक्षणात मुळीच रुची नव्हती. शिक्षणबाह्य बाबींवर जास्त भर देत होतो. त्यामुळे शिक्षणात गती नव्हती. इयत्ता तिसरीमध्ये नापास झालो होतो. शालेय शिक्षण मराठीत झाले. परिणामी, पुढे चालून इंग्रजीची मोठी समस्या उभी राहिली. त्यावर परिश्रमाने मात करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. वकिली व्यवसायात आल्यानंतर इतर सर्व गोष्टी बाजूला पडल्या. स्वत:ला पूर्णपणे वकिली व्यवसायात झोकून दिले. २५ वर्षे वकिली केल्यानंतर न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. तेव्हापर्यंत न्यायमूर्ती होण्याचा विचार मनात आला नव्हता अशी माहिती न्या. देशपांडे यांनी यावेळी दिली. त्यांचे बालमित्र अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी यांनी मुलाखतीचे संचालन केले. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नागपूरने घडविलेआपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व येथील सहकाऱ्यांनी घडविले. आपल्या यशामध्ये या दोघांचा मोठा वाटा आहे. मुंबई व औरंगाबाद येथील लोकांनी कितीही प्रशंसा केली तरी, कार्य करण्याचे खरे समाधान नागपूर खंडपीठातच आहे. आपल्या लोकांसोबत काम करण्यामध्ये नेहमीच आनंद वाटतो अशा भावना न्या. देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarathiमराठी