शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

देशात समान लोकसंख्या धोरण हवे

By admin | Updated: October 24, 2015 03:03 IST

भविष्यातील आव्हाने लक्षात घेता देशातील वाढत्या लोकसंख्येचे योग्य नियोजन कशा पद्धतीने होईल यासंदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे.

नागपूर : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता देशातील वाढत्या लोकसंख्येचे योग्य नियोजन कशा पद्धतीने होईल यासंदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे समस्या निर्माण होऊ नये यासाठी मतांचे राजकारण दूर सारून देशात समान लोकसंख्या धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. संघाचा शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते. मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करत देशात समान नागरी कायदा लागू करण्यात यावा ही मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अनेकदा करण्यात आली आहे. येत्या काळात संघ हा मुद्दा लावून धरणार असल्याचे संकेतच सरसंघचालकांनी दिले आहेत.देशाची लोकसंख्या वाढते आहे. ५० वर्षांनंतर ही लोकसंख्या ओझे होऊ नये व मनुष्यबळाचा योग्य वापर व्हावा यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. समान लोकसंख्या धोरण शासन व कायद्याच्या आधारावर लागू होणार नाही, याचा स्वीकार करताना समाजाची मान्यता घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेदेखील ते म्हणाले. देशाची निवडणूक व्यवस्था, प्रशासन, कर व्यवस्था, उद्योग धोरण, शिक्षणप्रणाली तसेच कृषी धोरणात आमूलाग्र बदलाची गरज असल्याचेदेखील ते म्हणाले.या कार्यक्रमाला ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ. विजय कुमार सारस्वत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.सारस्वत यांनी देशाच्या प्रगतीसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत यावर भाष्य केले. देशाची लोकसंख्या लक्षात घेता दुसऱ्या हरितक्रांतीची आवश्यकता असून कृषिमालाचे योग्य ‘मार्केटिंग’देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात संशोधनासाठी वेगळ््या ‘आयआयटी’ची गरज असल्याचेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, महानगर संघचालक दिलीप लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर तसेच दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.(प्रतिनिधी)मोदी सरकारला शाबासकीभाषणाच्या सुरुवातीलाच सरसंघचालकांनी मोदी सरकारला शाबासकी दिली. गेल्या दोन वर्षांपासून देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध अर्थव्यवस्था, राष्ट्राची सुरक्षा यासंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे विकसित व समर्थ भारताच्या निर्माणाचा विश्वास जनतेत उत्पन्न झाला आहे या शब्दांत सरसंघचालकांनी केंद्र शासनाचे कौतुकदेखील केले. विकास हा समन्वयातून व्हायला हवा. विविध योजन तळागाळापर्यंत पोहोचत आहेत का आढावा घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांशी संवाद साधला पाहिजे या शब्दांत मोदी सरकारला सल्लादेखील दिला.