शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनमुळे रखडला मनपाचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भीषण आहे. हजारो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भीषण आहे. हजारो लोकांचे बळी जात आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. उपचारासाठी रुग्ण व नातेवाइकांची भटकंती सुरू आहे. दुसरीकडे शहरातील विकासकामे ठप्प आहेत. प्रभागातील अत्यावश्यक कामेही रखडल्याने लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. सत्तापक्षाचा’डॅमेज कंट्रोल’साठी आटापिटा सुरू आहे. सलग दोन वर्षे विकासकामे रखडली असताना, पुढील वर्षांत निवडणुकीला सामोरे जावयाचे असल्याने सत्तापक्षाची चिंता वाढली आहे. त्यात परिवहन समितीने अद्याप अर्थसंकल्प सादर न केल्याने स्थायी समितीचा अर्थसंकल्प रखडला आहे.

सत्तापक्षातील अंतर्गत वादात इच्छा नसताना, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांना कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदाचा राजीनामा द्यावा लागला. बंटी कुकडे यांच्याकडे पुन्हा सभापतिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. परंतु, सभापतीची निवडणूक प्रलंबित असल्याने सध्या परिवहन विभागाला सभापती नाही. यामुळे विभागाचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर झालेला नाही. परिवहनचा अर्थसंकल्प सादर झाल्याशिवाय स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणे शक्य नाही.

स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी पदभार स्वीकारताच ३१ मार्चपूर्वी मनपाचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा संकल्प केला होता. अर्थसंकल्प लवकर सादर केला, तर रखडलेली विकासकामे पावसाळ्यापूर्वी सुरू करता येतील, लोकांचा रोष कमी होईल, असा त्यांचा मानस होता. परंतु, परिवहन समितीचा अर्थसंकल्प सादर न झाल्याने स्थायी समितीचा अर्थसंकल्प रखडला आहे. माजी सभापती बाल्या बोरकर यांनी परिवहन विभागाचा २०२०-२१ साठीचा ३०४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता.

...

तरतूद करूनही विकासाला ब्रेकच

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके यांनी २०२०-२१ या वर्षाचा २७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. १४ वर्षांत पहिल्यांदा ४६६.६ कोटीच्या तुटीचे बजेट सादर केले. रखडलेली कामे व्हावी, यासाठी नवीन कामांचा समावेश न करता २५० जुन्या कामांना मंजुरी दिली होती. यासाठी ३६० कोटींची तरतूद केली होती. परंतु, प्रशासनाचा असहकार व कोरोना संकटामुळे विकासकामे करता आली नाही.

...

बजेट कागदावरच तर राहणार नाही?

सभापतींची निवडणूक झाल्यानंतरच परिवहन समितीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. याला दोन-तीन आठवडे लागतील. त्यानंतर स्थायी समितीचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी काही दिवस जातील. यात मे महिन्यात अर्थसंकल्प सादर न झाल्यास जूनमध्ये पावसाला सुरुवात होईल. पावसाळ्यात विकासकामे ठप्पच असतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागेल. याचा विचार करता स्थायी समितीचा अर्थसंकल्प कागदावरच तर राहणार नाही ना, अशी चिंता सत्ताधाऱ्यांना लागली आहे.