शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

परिवहनमुळे रखडला मनपाचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भीषण आहे. हजारो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भीषण आहे. हजारो लोकांचे बळी जात आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. उपचारासाठी रुग्ण व नातेवाइकांची भटकंती सुरू आहे. दुसरीकडे शहरातील विकासकामे ठप्प आहेत. प्रभागातील अत्यावश्यक कामेही रखडल्याने लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. सत्तापक्षाचा’डॅमेज कंट्रोल’साठी आटापिटा सुरू आहे. सलग दोन वर्षे विकासकामे रखडली असताना, पुढील वर्षांत निवडणुकीला सामोरे जावयाचे असल्याने सत्तापक्षाची चिंता वाढली आहे. त्यात परिवहन समितीने अद्याप अर्थसंकल्प सादर न केल्याने स्थायी समितीचा अर्थसंकल्प रखडला आहे.

सत्तापक्षातील अंतर्गत वादात इच्छा नसताना, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांना कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदाचा राजीनामा द्यावा लागला. बंटी कुकडे यांच्याकडे पुन्हा सभापतिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. परंतु, सभापतीची निवडणूक प्रलंबित असल्याने सध्या परिवहन विभागाला सभापती नाही. यामुळे विभागाचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर झालेला नाही. परिवहनचा अर्थसंकल्प सादर झाल्याशिवाय स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणे शक्य नाही.

स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी पदभार स्वीकारताच ३१ मार्चपूर्वी मनपाचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा संकल्प केला होता. अर्थसंकल्प लवकर सादर केला, तर रखडलेली विकासकामे पावसाळ्यापूर्वी सुरू करता येतील, लोकांचा रोष कमी होईल, असा त्यांचा मानस होता. परंतु, परिवहन समितीचा अर्थसंकल्प सादर न झाल्याने स्थायी समितीचा अर्थसंकल्प रखडला आहे. माजी सभापती बाल्या बोरकर यांनी परिवहन विभागाचा २०२०-२१ साठीचा ३०४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता.

...

तरतूद करूनही विकासाला ब्रेकच

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके यांनी २०२०-२१ या वर्षाचा २७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. १४ वर्षांत पहिल्यांदा ४६६.६ कोटीच्या तुटीचे बजेट सादर केले. रखडलेली कामे व्हावी, यासाठी नवीन कामांचा समावेश न करता २५० जुन्या कामांना मंजुरी दिली होती. यासाठी ३६० कोटींची तरतूद केली होती. परंतु, प्रशासनाचा असहकार व कोरोना संकटामुळे विकासकामे करता आली नाही.

...

बजेट कागदावरच तर राहणार नाही?

सभापतींची निवडणूक झाल्यानंतरच परिवहन समितीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. याला दोन-तीन आठवडे लागतील. त्यानंतर स्थायी समितीचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी काही दिवस जातील. यात मे महिन्यात अर्थसंकल्प सादर न झाल्यास जूनमध्ये पावसाला सुरुवात होईल. पावसाळ्यात विकासकामे ठप्पच असतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागेल. याचा विचार करता स्थायी समितीचा अर्थसंकल्प कागदावरच तर राहणार नाही ना, अशी चिंता सत्ताधाऱ्यांना लागली आहे.