लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ रोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. या रोगामुळे आई व वडील यांचे निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशा बालकांची काळजी घेणारे कुणीही नसल्यास सदर बालक शोषणास बळी पडण्याची आहे. तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी यासारख्या गुन्ह्यामध्ये ओढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करता दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरावर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कृती दल गठित करण्यात आले आहे. तसेच महापालिकास्तरावरही कृती दल गठित करण्यात आल्याची माहिती समाजविकास विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी दिली.
कोविड-१९ या रोगामुळे ० ते १८ या वयोगटातील बालकांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले असल्यास अथवा या आजारामुळे आई व वडील रुग्णालयात दाखल असल्यास किंवा होत असल्यास त्यांच्या पाल्याचा ताबा कुणाकडे द्यावा, तसेच हक्काचे संरक्षण करायचे असल्यास खालील नमूद केलेल्या झोननिहाय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून सर्वाेतोपरी संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबतचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.
....
झोनचे समुदाय संघटना संपर्क क्रमांक
लक्ष्मीनगररेखा नवथलकर ७७२२००८२९१
धरमपेठमीनाक्षी चिडे ८८३०२५३३१३
हनुमाननगरज्योत्सना देशमुख ९३०९७९३००३
धंतोलीयोगेश्वर डांगे ८६०५८९६९०१
नेहरूनगरकल्पना अरमरकर ९८३४१२०१२७
गांधीबागभावना यादव ९३२५८७१४८८
सतरंजीपुरा संगीता मोटघरे ९४०३११९३८९
लकडगंज रूपाली साठवणे ७०५७०७७०६४३
आशीनगरसुरेंद्र बुरले ९१७५१३८९१९
मंगळवारीमित्रा मोहोड ८६६८३९३८०६