शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडे डेंग्यू नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:16 IST

नागपूर : उपराजधानीत सण-उत्सवाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ...

नागपूर : उपराजधानीत सण-उत्सवाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणले आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. परंतु महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात असल्याचे वास्तव आहे.

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा ॲण्टीबायोटिक किंवा ॲण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो. सध्या पावसाची उघडझाप, घराघरात सुरू असलेले कूलर, उघड्या असलेल्या पाण्याच्या टाक्या, मोकळ्या प्लाॅटवर साचून असलेले पाणी, रस्ते व इतरही बांधकामासाठी साठवून ठेवलेले पाणी डेंग्यू डासाची उत्पत्तीचे केंद्र ठरत आहे. डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी बाराही महिने घराघरांचे सर्वेक्षण केले जाते. परंतु मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडे आधीच मनुष्यबळ कमी असताना त्यांच्याकडे ‘कोरोना’चीही जबाबदारी देण्यात आल्याने सर्वेक्षणच झाले नाही. जून महिन्यात रुग्णांची संख्या ८६ वर गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले.

-घराघराच्या सर्वेक्षणाचा फायदा कुणाला?

जून महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताच मनपाने १६ जुलैपासून घराघराच्या सर्वेक्षणाची विशेष मोहीम हाती घेतली. यात आतापर्यंत ६७ हजार २०२ घरे दूषित म्हणजे, डेंग्यू अळी आढळून आल्या. विशेष म्हणजे, जुलै महिन्यात दूषित घरांची संख्या ५ हजार ९२९ असताना ऑगस्ट महिन्यात या घराची संख्या ६७ हजारावर गेली. यामुळे या मोहिमेचा फायदा कुणाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जोपर्यंत दूषित घरावर दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत सर्वेक्षणाचा फायदा होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- दरवर्षी डेंग्यूचा फैलाव तरी प्रभावी योजना नाही

दरवर्षी पावसाळयात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्वकाळजी घेतली जात नाही. परिणामी यावर्षी रोगाने थैमान घातले आहे. आजार पसरू नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणाच नाही. दहा फॉगिंग मशीन असताना यातील दोन कित्येक महिन्यापासून बंद आहे. ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ आठ फॉगिंग मशीन फिरवून डेंग्यूवर नियंत्रण आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

- गरज ८०० ची, काम करीत आहेत २१० कर्मचारी

डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला ८०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु जवळपास २१० कर्मचारी काम करीत आहेत. हॅण्ड फॉगिंग किंवा कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने डेंग्यूवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

::डेंग्यू रुग्णांची स्थिती

महिना : रुग्ण

जानेवारी :०२,

फेब्रुवारी :०१

मार्च :०३

मे:०६

जून: ८६

जुलै :२५१

ऑगस्ट :२१६

(दि. २५ पर्यंत )