शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

टंचाईच्या कामांना कोरोनाची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST

नागपूर : दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच ५१ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात ...

नागपूर : दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच ५१ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. यातील बहुतांश कामे जून महिन्याच्या आत पूर्ण करावयाची आहेत. परंतु मे महिना सुरू झाला असताना अद्याप टंचाई आराखड्यातून कामेच सुरू झाली नसल्याचे दिसत आहे. टंचाईच्या कामाला कोरोनाची झळ बसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

नागपूर जिल्हा परिषदेने यावर्षी ५१.२६ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार केला. यात २,५८० कामे १,०२६ गावात प्रस्तावित करण्यात आले. टंचाईच्या कामात नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, झिरे बुडक्या खोदणे आदी कामांचा समावेश आहे. ५१ कोटी रुपयाच्या आराखड्यापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी २१.५३ कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी दिली आहे. ४७५ गावांमध्ये यातील ६११ कामे होणार आहेत. परंतु सध्या १५ गावात १८ कामे प्रगतिपथावर आहेत. टंचाईच्या कामाची गती लक्षात घेता, पावसाळा सुरू झाल्यावरही टंचाईची कामे सुरूच राहील असे दिसत आहे. दुसरीकडे ग्रामस्थांकडून ओरड सुरू झाली आहे.

- सध्या कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक कामांवर परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांची सेवा जिल्हा प्रशासनाने कोरोनासाठी घेतली आहे. स्टॅम्प पेपर उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायतशी टंचाईचे करार थांबले आहे. संचारबंदीची झळ टंचाईच्या कामाला बसली आहे.

रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प.