शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

टंचाईच्या कामांना कोरोनाची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST

नागपूर : दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच ५१ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात ...

नागपूर : दरवर्षी जिल्ह्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातच ५१ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. यातील बहुतांश कामे जून महिन्याच्या आत पूर्ण करावयाची आहेत. परंतु मे महिना सुरू झाला असताना अद्याप टंचाई आराखड्यातून कामेच सुरू झाली नसल्याचे दिसत आहे. टंचाईच्या कामाला कोरोनाची झळ बसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

नागपूर जिल्हा परिषदेने यावर्षी ५१.२६ कोटी रुपयाचा टंचाई आराखडा तयार केला. यात २,५८० कामे १,०२६ गावात प्रस्तावित करण्यात आले. टंचाईच्या कामात नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे खोलीकरण व गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, झिरे बुडक्या खोदणे आदी कामांचा समावेश आहे. ५१ कोटी रुपयाच्या आराखड्यापैकी जिल्हाधिकाऱ्यांनी २१.५३ कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी दिली आहे. ४७५ गावांमध्ये यातील ६११ कामे होणार आहेत. परंतु सध्या १५ गावात १८ कामे प्रगतिपथावर आहेत. टंचाईच्या कामाची गती लक्षात घेता, पावसाळा सुरू झाल्यावरही टंचाईची कामे सुरूच राहील असे दिसत आहे. दुसरीकडे ग्रामस्थांकडून ओरड सुरू झाली आहे.

- सध्या कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक कामांवर परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांची सेवा जिल्हा प्रशासनाने कोरोनासाठी घेतली आहे. स्टॅम्प पेपर उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायतशी टंचाईचे करार थांबले आहे. संचारबंदीची झळ टंचाईच्या कामाला बसली आहे.

रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प.