शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

ग्रामीणमध्ये कोरोना सुसाट, आता गावकऱ्यांनीच दाखवावी शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:08 IST

नागपूर : आजच्या घडीला शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यावाढ व मृत्यू सारखेच होत आहे. शहरात कशीबशी आरोग्य ...

नागपूर : आजच्या घडीला शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यावाढ व मृत्यू सारखेच होत आहे. शहरात कशीबशी आरोग्य यंत्रणा शाबूत आहे, पण ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील १४०० गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले होते. तशीच शिस्त आता गावकऱ्यांनी दाखविल्याशिवाय पर्याय नाही. बेफिकिरी केल्यास जीवघेणा कोरोना मोठा ब्लास्ट करू शकतो.

रुग्णांची संख्या भरमसाट वाढल्याने गावांची आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये चाचण्या होत आहेत. संक्रमण जास्त नसलेल्या रुग्णांना औषधी पुरविण्यात येत आहे. पण संक्रमण वाढलेल्या रुग्णांना थेट नागपूर गाठावे लागत आहे. शहरातही बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव भांड्यात अडकतो आहे.

- दृष्टिक्षेपात...

जिल्ह्यात एकूण रुग्ण - २९१०४३

ग्रामीणमध्ये एकूण रुग्ण - ६९६३३

ग्रामीणमधील गृह विलगीकरणातील रुग्ण - विभागाकडे आकडेवारी नाही

- कोरोनाचा लढा सुरू आहे विटॅमिनच्या गोळ्यांवर

पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून विटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटर तर दूरच, ऑक्सिजनची देखील सोय नाही. एक्स-रे मशीन बंद आहे. रेडिओलॉजिस्ट नाही. रेमडेसिविर, फॅबिफ्लू यासारख्या औषधी ग्रामीण भागात मिळत नाहीत.

- मेयो, मेडिकलची भीती

ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे की, टेस्टिंग केल्यावर पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल, मेयो रुग्णालयात पाठविण्यात येते. तिथे गेलेला रुग्ण परत येत नाही, त्याची राखच येते. त्यामुळे टेस्टिंग न करता घरच्या घरी उपचार करीत आहेत. गावा-गावात मेयो, मेडिकलच्याबाबतीत दहशत निर्माण झाली आहे. घरी मरू, पण मेडिकलमध्ये जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांची आहे. तसे आरोग्य केंद्रात लिहूनही देत आहेत. त्याचबरोबर शहरात बेड्‌स उपलब्ध नसल्याने रुग्णांवर गावातच उपचार करावे लागत आहेत.

- आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांचा वॉच

ग्रामीण भागात खऱ्याअर्थाने काम करणारी यंत्रणा म्हणजे आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका होय. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन ही यंत्रणा त्यांचा दररोजचा हालहवाल घेत आहे. ग्रामीण भागातील अर्धी सरकारी यंत्रणा क्वारंटाईन आहे.

- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाहीच

रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची टेस्ट केली जाते. या प्रक्रियेला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात, आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याने तसे होत नाही. मुळात गामीण भागात अनेक लोक टेस्टच करीत नाहीत. काही सरकारी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगीमध्ये दुसऱ्यांदा टेस्ट करतात. त्यादरम्यान संपूर्ण गावाच्या संपर्कात येतात. गृह विलगीकरणात रुग्णाला ठेवल्यास छोटे छोटे घर असल्याने उद्देश साध्य होत नाही. कोविड केअर सेंटर्सची संख्या अपुरी आहे.

- ग्रामपंचायतीमध्ये फक्त शासकीय कर्मचारीच काम करीत आहेत. पोलीसपाटील तर घरूनच टपल्या मारते. लीडर फक्त लीडरकी करीत आहे. लोकांना नियम सांगायला गेलो, तर दोन गोष्टी आम्हालाच ऐकाव्या लागतात. कुणाला हटकले तर आम्हाला लाथा-बुक्क्या खाव्या लागतात. सरकारी कर्मचाऱ्याला ग्रामीण स्तरावर प्रोटेक्शनच नाही.

- हरिदास रानडे, जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रामसेवक संघटना

- लोक सहकार्य करीत नाहीत. मास्क लावत नाहीत. घर सील करावे तर घराबाहेर पडतात. ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत. रुग्णालयात जायला तयार नाहीत, घरातच उपचार घेत आहेत. होळीनंतर मृत्यूच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रशासनाचे ग्रामीण भागाकडे लक्ष नाही. लोकांवर वेळीच उपचार होत नसल्याने मरण डोळ्यापुढे आहे.

- शरद डोणेकर, माजी आरोग्य सभापती

- जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा हतबल

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अचानक वाढलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य यंत्रणा सुद्धा हतबल झाली आहे. आम्ही उपलब्ध असलेल्या यंत्रणेवर लढा देत आहोत. पण आमच्याही मर्यादा आहेत. ही लाट थांबवायची असेल तर लोकांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे, अशी भूमिका आरोग्य विभागाची आहे.