शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मांडला डाव, लग्नासाठी चातुर्मासाचेही वाढले भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

- शास्त्रार्थाच्या तोडग्यातून काढले जात आहेत पर्यायी मुहूर्त प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय पंचांगानुसार आषाढ ...

- शास्त्रार्थाच्या तोडग्यातून काढले जात आहेत पर्यायी मुहूर्त

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय पंचांगानुसार आषाढ मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून (देवशयनी एकादशी) चातुर्मास प्रारंभ होतो आणि कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला (प्रबोधिनी स्मार्त एकादशी) चातुर्मासाचा समारोप होतो. या काळात देव निद्राधीन असताना असा एक समज आहे. देवाच्या साक्षीने शुभकार्ये व्हावीत, अशी मनोमनी भावना असते आणि म्हणूनच या काळात विवाहादी कोणतीही शुभकार्ये टाळली जातात. ही परंपरा आजही भारतीय जनमानसात रुजलेली आहे. मात्र, व्यस्तता, दूरवर निर्माण झालेले नातेसंबंध, वैज्ञानिक उकल, शास्त्रार्थ आदींच्या तोडग्यातून विवाहादी शुभकार्यासाठी चातुर्मासह उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे.

पाच महिने आणि चातुर्मास कसे?

म्हणायला चातुर्मासात आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन व कार्तिक या पाच महिन्यांचा समावेश होतो. आषाढ मासातील सुरुवातीचे दहा दिवस चातुर्मासात गणले जात नाहीत आणि कार्तिक महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस चातुर्मासात गणले जातात. हे दोन्ही महिन्यांतील अर्धे-अर्धे दिवसाचा एक मास मिळून चातुर्मासाची गणती पूर्ण होत असते.

चातुर्मासातील शुभ मुहूर्त (आपात्कालीन)

ऑगस्ट - १०, ११, १४, १८, २०, २१, २६, २७ (८ मुहूर्त)

सप्टेंबर - १६ (१ मुहूर्त)

ऑक्टोबर - ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४ (९ मुहूर्त)

मंगल कार्यालये बुक

शहरात सध्या दुपारी ४ वाजतानंतर लॉकडाऊन आहे. तरी विवाहादी कार्ये मंगल कार्यालये व हॉटेल्समध्ये संध्याकाळी पार पाडत होती. दरम्यान मनपा प्रशासनाने कारवाई केल्याने आता मंगलकार्यालये दुपारी ४ वाजेनंतरच्या कोणत्याही कार्यक्रमांना स्वीकारत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सकाळच्या मुहूर्ताचे विवाहसोहळे मर्यादित संख्येत मंगल कार्यालयांमध्ये पार पाडली जात आहेत. स्वागत समारंभ मात्र मंगल कार्यालयांमध्ये होताना दिसत नाहीत.

परवानगी ५० आमंत्रितांचीच

राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने कोणत्याही जाहीर आयोजनास अद्याप परवानगी दिलेली नाही. आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणून विवाह सोहळ्यांना केवळ ५० आमंत्रितांची परवानगी दिली आहे. त्यानुसार अनेक जण घरगुती सोहळे साजरे करत असल्याचे दिसून येते. निमंत्रणामध्ये हळदीचे जेवण, विवाहाचे जेवण आणि स्वागत समारंभाचे जेवण अशी गटवारी करून मर्यादित लोकांना आमंत्रित केले जात असल्याचे दिसून येत आहे.

पर्जन्य काळात मुहूर्त न काढणे, ही शिकवण

आषाढ मासापासून भारतात पर्जन्यकाळ सुरू होतो. पूर्वीच्या काळी पावसाळ्यात विवाह सोहळ्याचे आयोजन कठीण होत असते. वाहतूक व्यवस्था उत्तम नव्हती आणि अनेक अडचणींमुळे पंचांगकर्त्यांनीच सर्वसामान्यांच्या सोयीसाठी चातुर्मासात विवाह मुहूर्त, वास्तू मुहूर्त काढू नये, असे सांगितले गेले. यात वैज्ञानिक किंवा अवैज्ञानिक असा विषय नाही. आता मात्र, सगळ्या सोयी असल्याने आणि अनेक पर्याय असल्याने या काळात विवाहमुहूर्त काढले जात आहेत. शिवाय, भौगोलिकदृष्ट्या पंचांगही वेगवेगळे असते. उत्तर भारतात चातुर्मासात शुभ कार्य होत नाही तर दक्षिण भारतात होतात. हा दूरवर नातेसंबंध पसरत असल्याचाही एक परिणाम म्हणून बघता येईल.

- डॉ. अनिल वैद्य, ज्योतिषाचार्य

बालविवाह आता होत नाहीत

पूर्वीच्या काळी अष्टवर्षात्मक अर्थात बाल विवाह मोठ्या प्रमाणात होत असत. बालकांना हा चातुर्मास (पावसाळा) घातक असतो, अशी मानना आहे. त्यातच बालकांना पावसाळ्यात अनेक धोके आढळतात. तत्कालीन परिस्थितीनुरूप हा विचार करावा. शुभकार्यात कोणतेही विघ्न नकोत म्हणून या काळात हे मुहूर्त टाळले जात. आता वयस्क वयात विवाह होतात आणि अन्य सुविधाही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आषाढ म्हणा वा चातुर्मास विवाहासाठी अडसर ठरत नाहीत.

- मनोज हातूलकर गुरुजी, पुरोहित

.......................