शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

गृहउद्योगांना कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनमुळे मध्यम, लघु, सूक्ष्म आणि गृहउद्योगांवर संकट आले आहे. सर्व उद्योग पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी झटत आहेत. ...

नागपूर : लॉकडाऊनमुळे मध्यम, लघु, सूक्ष्म आणि गृहउद्योगांवर संकट आले आहे. सर्व उद्योग पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी झटत आहेत. मोठ्या उद्योगांसाठी जुळलेले लघु व गृहउद्योगात रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. त्यातच खादी उद्योगाशी जुळलेले आणि स्वतंत्ररीत्या गृहउद्योग करणारे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील उद्योजकांची उत्पादने कोरोना काळात न विकल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. शिवाय अनेकांना रोजगाराचा सामना करावा लागत आहे.

विदर्भात गृहउद्योगाची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. अनेक महिला व पुरुष लोणची, पापड, तिखट, मसाला, शॉम्पू, मेंदी, अगरबत्ती, वॉशिंग पावडर आदी उत्पादने तयार करून रोजगार निर्मिती करतात. पण गृहउद्योगावर दीड वर्षांपासून कोरोनाचे ग्रहण लागले आहे. नोंदणीकृत आकडेवारीनुसार विदर्भात जवळपास २५०० हजारांपेक्षा जास्त गृहउद्योग आहेत. ही संख्या नागपुरात ५०० पेक्षा जास्त आहे. त्यापैकी ७५ टक्के युनिट बंद पडले आहेत.

खादी ग्रामोद्योगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, खादी ग्रामोद्योगमुळे अनेक लहान-लहान लोकांना काम मिळत होते. त्यांचे रोजगाराचे साधन बनले होते. लहान उद्योजक म्हणून ते काम करीत होते. पण आता त्यांचे उद्योग बंद पडले आहेत. राज्य शासनाकडून काहीही मदत न मिळाल्याने महिलांचा रोजगार हिरावला आहे. पुन्हा काम सुरू करण्यासाठी त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.

गृहउद्योजक मंगेश शेंडे म्हणाले, कोरोना काळात तिखट, मसाल्यांची विक्री मंदावल्यामुळे व्यवसायाची साखळी तुटली आहे. अनलॉक झाले असले तरीही उद्योग रूळावर येण्यास वेळ लागेल. सध्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. दुकानदारांना जुन्याच किमतीत माल हवा आहे. मालाचे दर वाढल्याने दुकानदार ब्रॅण्डेड कंपन्यांचा माल ठेवत आहे.

प्राजक्ता दहीवाल म्हणाल्या, फरसाणचे पॅकेट तयार करण्याचा गृहउद्योग आहे. कोरोना काळात व्यवसाय बंद झाला. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या महिलांचा रोजगार हिरावला आहे. शिवाय आमची उलाढाल थांबली. नव्याने उद्योग सुरू करण्याची धडपड सुरू आहे. अनलॉकनंतर उद्योगाला पूर्वीचे दिवस येतील, अशी अपेक्षा आहे.

अतुल लांजेवार म्हणाले, फिनाईल, वॉशिंग पावडर, भांड्याचे पावडर निर्मितीचा गृहउद्योग आहे. कोरोना काळात दुकाने बंद असल्याने उत्पादन आणि विक्री बंद होती. त्यामुळे दहा जणांच्या रोजगारावर संकट आले. शिवाय आर्थिक फटका बसला. त्या काळात दुकानदारांनी ब्रॅण्डेड उत्पादनांची विक्री केली. अनलॉकनंतर निर्मिती सुरू केली आहे. विक्री पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे.