शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

कोरोनामुळे लोक झालेत शाकाहारी : नागपुरात डाळींची विक्री ३० टक्के वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:30 IST

कोरोना व्हायरसच्या भीतीने देशात जवळपास ५० टक्के लोकांनी मांसाहाराचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींचे सेवन सुरू केल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे.

ठळक मुद्देदेशात डाळींचा मुबलक साठा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसच्या भीतीने देशात जवळपास ५० टक्के लोकांनी मांसाहाराचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींचे सेवन सुरू केल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. तूर आणि चणा डाळीला जास्त मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.होलसेल धान्य असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, सध्या तूर डाळीसह अन्य डाळीची जास्त प्रमाणात विक्री होत आहे. ग्राहकांकडून दररोज मागणी वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात डाळींचे उत्पादन २४० ते २५० लाख टन होते. त्यातुलनेत विक्रीही अंदाजे २५० लाख टन आहे. डाळींचे उत्पादन वाढल्याने अनेक डाळी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात विकत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे सरकारने डाळींच्या आयातीवर मात्रात्मक निर्बंध लावण्याचे आदेश जारी केले होते. विदेशातून चणा, तूर, मूग, उडद, वाटाणा, मसूर, काबुली चणा, हिरवा वाटाणा आयात होते. आता मात्रात्मक आयातीचे निर्बंध हटविले आहेत. याशिवाय बंद असलेली निर्यात सुरू झाली आहे. पण सरकारने अनेक डाळींवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले आहे. तसेच सरकारनेही मोठ्या प्रमाणात सरकारी एजन्सीच्या माध्यमातून देश-विदेशातून डाळींची खरेदी सुरू केली आहे. त्यानंतरही देशात डाळींचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी राहिले.मोटवानी म्हणाले, मार्चच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने देशात सुरक्षेच्या दृष्टीने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आणि लोकांना बचावासाठी जागरूकता अभियान सुरू केले. लोकांनी मांसाहार त्यागून शाकाहाराचा अवलंब सुरू केला. त्यामुळेच सर्व प्रकारच्या डाळींच्या विक्रीत ३० टक्के वाढ झाली. लॉकडाऊननंतर देशात गतवर्षीच्या याच काळात २१ लाख टनाच्या तुलनेत २६ लाख टन डाळींची विक्री झाली. देशात डाळींची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी अपेक्षेपेक्षा जास्त डाळींची खरेदी करू नये. सरकारकडे ४३५ लाख टन खाद्यान्नांचा साठा आहे. त्यामध्ये २७२.१९ लाख टन तांदूळ, १६२.७९ लाख टन गहू आणि ३७ लाख टन डाळींचा साठा आहे. या साठ्यातून सरकार १ एप्रिलपासून ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू आणि एक किलो तूर डाळ रेशन दुकानातून दरमहा देत आहे. त्यामुळे गरिबांची गरज पूर्ण होणार आहे.सध्या देशात डाळींचा पुरेशा साठा आहे. पण वाहतूक व्यवस्था बंद असल्याने माल होलसेलमधून किरकोळमध्ये मिळत नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत. सध्या कच्चा माल नसल्याने फिनिश मालाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पण लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर भाव पुन्हा कमी होणार आहे. मोटवानी म्हणाले, मांसाहाराच्या तुलनेत एक कुटुंब एक किलो डाळीचा उपयोग अनेक दिवस करू शकतो. डाळींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. देशात डाळींची विक्री वाढण्याचे संकेत चांगले आहेत. त्यामुळे पिकाला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. देशात डाळीच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न