शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनामुळे लोक झालेत शाकाहारी : नागपुरात डाळींची विक्री ३० टक्के वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:30 IST

कोरोना व्हायरसच्या भीतीने देशात जवळपास ५० टक्के लोकांनी मांसाहाराचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींचे सेवन सुरू केल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे.

ठळक मुद्देदेशात डाळींचा मुबलक साठा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसच्या भीतीने देशात जवळपास ५० टक्के लोकांनी मांसाहाराचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींचे सेवन सुरू केल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. तूर आणि चणा डाळीला जास्त मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.होलसेल धान्य असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, सध्या तूर डाळीसह अन्य डाळीची जास्त प्रमाणात विक्री होत आहे. ग्राहकांकडून दररोज मागणी वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात डाळींचे उत्पादन २४० ते २५० लाख टन होते. त्यातुलनेत विक्रीही अंदाजे २५० लाख टन आहे. डाळींचे उत्पादन वाढल्याने अनेक डाळी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात विकत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे सरकारने डाळींच्या आयातीवर मात्रात्मक निर्बंध लावण्याचे आदेश जारी केले होते. विदेशातून चणा, तूर, मूग, उडद, वाटाणा, मसूर, काबुली चणा, हिरवा वाटाणा आयात होते. आता मात्रात्मक आयातीचे निर्बंध हटविले आहेत. याशिवाय बंद असलेली निर्यात सुरू झाली आहे. पण सरकारने अनेक डाळींवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले आहे. तसेच सरकारनेही मोठ्या प्रमाणात सरकारी एजन्सीच्या माध्यमातून देश-विदेशातून डाळींची खरेदी सुरू केली आहे. त्यानंतरही देशात डाळींचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी राहिले.मोटवानी म्हणाले, मार्चच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने देशात सुरक्षेच्या दृष्टीने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आणि लोकांना बचावासाठी जागरूकता अभियान सुरू केले. लोकांनी मांसाहार त्यागून शाकाहाराचा अवलंब सुरू केला. त्यामुळेच सर्व प्रकारच्या डाळींच्या विक्रीत ३० टक्के वाढ झाली. लॉकडाऊननंतर देशात गतवर्षीच्या याच काळात २१ लाख टनाच्या तुलनेत २६ लाख टन डाळींची विक्री झाली. देशात डाळींची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी अपेक्षेपेक्षा जास्त डाळींची खरेदी करू नये. सरकारकडे ४३५ लाख टन खाद्यान्नांचा साठा आहे. त्यामध्ये २७२.१९ लाख टन तांदूळ, १६२.७९ लाख टन गहू आणि ३७ लाख टन डाळींचा साठा आहे. या साठ्यातून सरकार १ एप्रिलपासून ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू आणि एक किलो तूर डाळ रेशन दुकानातून दरमहा देत आहे. त्यामुळे गरिबांची गरज पूर्ण होणार आहे.सध्या देशात डाळींचा पुरेशा साठा आहे. पण वाहतूक व्यवस्था बंद असल्याने माल होलसेलमधून किरकोळमध्ये मिळत नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत. सध्या कच्चा माल नसल्याने फिनिश मालाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पण लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर भाव पुन्हा कमी होणार आहे. मोटवानी म्हणाले, मांसाहाराच्या तुलनेत एक कुटुंब एक किलो डाळीचा उपयोग अनेक दिवस करू शकतो. डाळींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. देशात डाळींची विक्री वाढण्याचे संकेत चांगले आहेत. त्यामुळे पिकाला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. देशात डाळीच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न