शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय हवा

By admin | Updated: February 26, 2016 03:06 IST

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना भेटतात

विशेषाधिकार समितीची अनौपचारिक चर्चा : समिती प्रमुख नीलम गोऱ्हे यांचे मतनागपूर : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना भेटतात तेव्हा ते समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कालबद्धता पाळल्यास विशेषाधिकार भंगाचे प्रकार टाळता येणे शक्य आहे. असे मत विधान परिषद विशेषाधिकार समिती प्रमुख तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.रविभवन येथील सभागृहात शासकीय विभाग प्रमुखांसोबत आयोजित अनौपचारिक चर्चेच्यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे या बोलत होत्या. यावेळी विशेषाधिकार समितीचे सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर, शरद रणपिसे, श्रीकांत देशपांडे तसेच आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, नागो गाणार, प्रा. अनिल सोले, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, विभागीय आयुक्त अनुप कुमार आदी उपस्थित होते.डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, शिक्षण विभागाविषयी ज्या अनेक तक्रारी आहेत त्यासाठी विशेषाधिकार समितीची वेगळी बैठक घेण्यात येईल. यासोबतच पोलीस विभाग राबवित असलेल्या गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क व प्रणाली (सीसीटीएनएस) या पद्धतीविषयी त्या-त्या जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांना सादरीकरणाद्वारे माहिती देण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी सूचना उपस्थित पोलीस अधीक्षकांना यावेळी केली.अधिकाऱ्यांनी कायद्याच्या तरतुदीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सार्वजनिक समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींसोबत सौजन्यपूर्वक वागणूक तसेच त्यांनी दिलेल्या पत्राची तातडीने दखल घेऊन पोच देण्याच्या कामी सुद्धा तत्परता दाखवावी, अशी सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.आ. नागो गाणार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास यांनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या. बैठकीत जिल्हाधिकारी सर्वश्री डॉ. दीपक म्हैसेकर(चंद्रपूर), आशुतोष सलील(वर्धा), डॉ. विजय सूर्यवंशी(गोंदिया), पोलीस अधीक्षक अनंत रोकडे(नागपूर), अंकित गोयल(वर्धा), शशिकुमार मीना(गोंदिया), चंद्रपूर मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, डॉ. महेंद्र कल्याणकर, राजेंद्र निंबाळकर, दिलीप गावडे तसेच सुनील पडोळे, जी. एम.तळपाडे, अपर आयुक्त हेमंत पवार आणि विधान मंडळाचे विधी उपसचिव नंदलाल काळे, अवर सचिव उमेश शिंदे आदी उपस्थित होते.