शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

‘स्वाईन फ्लू’ नियंत्रणासाठी सहकार्य करा

By admin | Updated: April 24, 2017 01:54 IST

स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतानाच ...

चंद्रशेखर बावनकुळे : आयएमए, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ व अधिकाऱ्यांची बैठकनागपूर : स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतानाच व्हेंटिलेटर व आयसीयु असलेल्या रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून उपचार करण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १३ रुग्ण दगावले आहे. या आजारावर तात्काळ नियंत्रण तसेच आवश्यक औषधोपचार या संदर्भात आयएमए, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात सूचना देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र्र सवई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त रामनाथ सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे, डॉ. प्रफुल्ल पांडे, डॉ. पोद्दार, डॉ. गिल्लुरकर आदी तज्ज्ञ उपस्थित होते. (प्रतिनिधी) आजाराबाबत जागृती मोहीम राबविणारस्वाईन फ्लू आजारासंदर्भात रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती असावी या दृष्टीने प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू या आजाराबद्दल तसेच घ्यावयाच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन करण्यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जनतेनेही पॅनिक होऊ नये, असे आवाहन केले. घाबरू नका खबरदारी घ्यास्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य असून नागरिकांनी या आजाराबाबत न घाबरता हा आजार पसरू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार विनाविलंब सुरू करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये व फ्लूची लक्षणे असतील तर हस्तांदोलन न करण्याची काळजी घ्यावी असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले.नागपुरात २२ रुग्णांमध्ये लक्षणे जिल्हा शल्य चिकित्सक उमेश नवाडे यांनी माहिती देताना सांगितले की, नागपूर शहर व ग्रामीण भागात रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यापैकी २२ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. तर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे यांनी महानगरपालिकेतर्फे ३४ रुग्णालयांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती दिली.