शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

‘स्वाईन फ्लू’ नियंत्रणासाठी सहकार्य करा

By admin | Updated: April 24, 2017 01:54 IST

स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतानाच ...

चंद्रशेखर बावनकुळे : आयएमए, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ व अधिकाऱ्यांची बैठकनागपूर : स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतानाच व्हेंटिलेटर व आयसीयु असलेल्या रुग्णालयांनी रुग्णांना दाखल करून उपचार करण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १३ रुग्ण दगावले आहे. या आजारावर तात्काळ नियंत्रण तसेच आवश्यक औषधोपचार या संदर्भात आयएमए, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात सूचना देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उमेश नवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र्र सवई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त रामनाथ सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे, डॉ. प्रफुल्ल पांडे, डॉ. पोद्दार, डॉ. गिल्लुरकर आदी तज्ज्ञ उपस्थित होते. (प्रतिनिधी) आजाराबाबत जागृती मोहीम राबविणारस्वाईन फ्लू आजारासंदर्भात रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती असावी या दृष्टीने प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू या आजाराबद्दल तसेच घ्यावयाच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन करण्यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जनतेनेही पॅनिक होऊ नये, असे आवाहन केले. घाबरू नका खबरदारी घ्यास्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य असून नागरिकांनी या आजाराबाबत न घाबरता हा आजार पसरू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार विनाविलंब सुरू करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये व फ्लूची लक्षणे असतील तर हस्तांदोलन न करण्याची काळजी घ्यावी असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले.नागपुरात २२ रुग्णांमध्ये लक्षणे जिल्हा शल्य चिकित्सक उमेश नवाडे यांनी माहिती देताना सांगितले की, नागपूर शहर व ग्रामीण भागात रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यापैकी २२ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. तर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. चिवाणे यांनी महानगरपालिकेतर्फे ३४ रुग्णालयांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती दिली.