शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बांबूला उद्योगात परिवर्तित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:09 IST

नागपूर : भारतात जगातील ३० टक्के बांबू वनस्पतीचे उत्पादन होते. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, त्याचे उद्योगात रूपांतरण झालेले ...

नागपूर : भारतात जगातील ३० टक्के बांबू वनस्पतीचे उत्पादन होते. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, त्याचे उद्योगात रूपांतरण झालेले नाही. बांबूला उद्योगात परिवर्तित करण्याचे तंत्र विकसित करण्याची गरज असल्याचे मत बेंगळूरू येथील आयपीआयआरटीआयचे वैज्ञानिक डॉ. विपिनकुमार चावला यांनी व्यक्त केले.

जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब आॅफ नागपूर एलाईटच्या वतीने बांबू संवर्धन व विकासावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बांबू टेक्नोलॉजी या विषयावर आपले मत मांडत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड, नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक आयएफएस एम. श्रीनिवास राव होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी उपस्थित होते.

आशिया खंडात ६५ टक्के, भारतात ३० टक्के तर चीनमध्ये ३५ टक्के बांबूचे पिक घेतले जाते. चीनमध्ये पिकणारा बांबू उसासारखा असल्याने, त्याचे हार्वेस्टिंग चांगल्या प्रकारे होते. मात्र, भारतात बांबूचे हार्वेस्टिंग कठीण काम आहे. त्याअनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने मात्र, त्याअनुषंगाने उत्तम पाऊल टाकल्याचेही डॉ. विपिनकुमार चावला यावेळी म्हणाले.

यावेळी गिरीश गांधी म्हणाले, जगात बांबूच्या १४८ प्रजाती असून भारतात केवळ २९ प्रजातीच आहेत. बांबू पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. बांबूपासून तयार केलेल्या दागिन्यांवर पुणे येथील बांबू तंत्रच्या संस्थापिका दया पत्नी यांनी यावेळी बांबूच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकला.

या वेबिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ नागपूर एलाईटचे अध्यक्ष शुभंकर पाटील, महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवास राव, डॉ. एन. भारती, सचिन गोडसे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन वनराई फाऊंडेशनचे अजय पाटील यांनी केले. गणेश हरीमकर यांनी मानले.