शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

बांबूला उद्योगात परिवर्तित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:09 IST

नागपूर : भारतात जगातील ३० टक्के बांबू वनस्पतीचे उत्पादन होते. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, त्याचे उद्योगात रूपांतरण झालेले ...

नागपूर : भारतात जगातील ३० टक्के बांबू वनस्पतीचे उत्पादन होते. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, त्याचे उद्योगात रूपांतरण झालेले नाही. बांबूला उद्योगात परिवर्तित करण्याचे तंत्र विकसित करण्याची गरज असल्याचे मत बेंगळूरू येथील आयपीआयआरटीआयचे वैज्ञानिक डॉ. विपिनकुमार चावला यांनी व्यक्त केले.

जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब आॅफ नागपूर एलाईटच्या वतीने बांबू संवर्धन व विकासावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बांबू टेक्नोलॉजी या विषयावर आपले मत मांडत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड, नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक आयएफएस एम. श्रीनिवास राव होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी उपस्थित होते.

आशिया खंडात ६५ टक्के, भारतात ३० टक्के तर चीनमध्ये ३५ टक्के बांबूचे पिक घेतले जाते. चीनमध्ये पिकणारा बांबू उसासारखा असल्याने, त्याचे हार्वेस्टिंग चांगल्या प्रकारे होते. मात्र, भारतात बांबूचे हार्वेस्टिंग कठीण काम आहे. त्याअनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने मात्र, त्याअनुषंगाने उत्तम पाऊल टाकल्याचेही डॉ. विपिनकुमार चावला यावेळी म्हणाले.

यावेळी गिरीश गांधी म्हणाले, जगात बांबूच्या १४८ प्रजाती असून भारतात केवळ २९ प्रजातीच आहेत. बांबू पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. बांबूपासून तयार केलेल्या दागिन्यांवर पुणे येथील बांबू तंत्रच्या संस्थापिका दया पत्नी यांनी यावेळी बांबूच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकला.

या वेबिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ नागपूर एलाईटचे अध्यक्ष शुभंकर पाटील, महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवास राव, डॉ. एन. भारती, सचिन गोडसे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन वनराई फाऊंडेशनचे अजय पाटील यांनी केले. गणेश हरीमकर यांनी मानले.