शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

शेतकरी कर्जमाफीसाठी ई-सेवा सेतू केंद्रात सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:36 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जमाफी योजनेचे अर्ज आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहे.

ठळक मुद्देविशेष शिबिर : १५ सप्टेंबरपूर्वी आॅनलाईन अर्ज करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जमाफी योजनेचे अर्ज आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहे. त्यासाठी सर्व ई-सुविधा केंद्रामध्ये तसेच सेतू केंद्रामध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शनिवारपासून तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय येथे विशेष आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. १५ सप्टेंबरपूर्वी अर्ज करणाºयांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे सर्व शेतकरी खातेदारांनी हे भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.या शिबिरात जाऊन शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज करावे. यासोबतच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ७२ शाखांमध्येही अर्ज भरता येतील.ही नोंदणी करताना अर्जदार व पती-पत्नीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणीसाठी महा ई-सेवाकेंद्र, सुविधा केंद्र, तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७२ शाखांसह तहसील कार्यालय, तसेच मंडळ कार्यालयात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन कर्जमाफी योजनेत सहभाग घ्यावा. प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, तसेच कृषी विकास अधिकारी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी साहाय्य करणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करणार आहेत.शेतकरी कर्जमाफी योजनेच्या शेतकºयांना लाभ घेता यावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक संपूर्ण मदत करणार आहे. त्यानुसार शेतकºयांनी कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी १५ सप्टेंबरपूर्वी आॅनलाईन अर्ज सादर करून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.आतापर्यंत १४ हजारावर शेतकºयांचे अर्जशेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने १ एप्रिल २००९ नंतरचे वाटप झालेले मात्र ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार असून, दीड लाखापेक्षा जास्त असलेल्या कर्जाची रक्कम भरणा केल्यास शासनाकडून दीड लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना मिळणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांचे सुमारे २६ हजार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २४ हजार अशा सुमारे ५० हजार शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजारापेक्षा जास्त शेतकºयांनी कर्जमाफी मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.