शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी ई-सेवा सेतू केंद्रात सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:36 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जमाफी योजनेचे अर्ज आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहे.

ठळक मुद्देविशेष शिबिर : १५ सप्टेंबरपूर्वी आॅनलाईन अर्ज करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जमाफी योजनेचे अर्ज आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहे. त्यासाठी सर्व ई-सुविधा केंद्रामध्ये तसेच सेतू केंद्रामध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शनिवारपासून तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय येथे विशेष आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. १५ सप्टेंबरपूर्वी अर्ज करणाºयांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे सर्व शेतकरी खातेदारांनी हे भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.या शिबिरात जाऊन शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज करावे. यासोबतच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ७२ शाखांमध्येही अर्ज भरता येतील.ही नोंदणी करताना अर्जदार व पती-पत्नीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणीसाठी महा ई-सेवाकेंद्र, सुविधा केंद्र, तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७२ शाखांसह तहसील कार्यालय, तसेच मंडळ कार्यालयात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन कर्जमाफी योजनेत सहभाग घ्यावा. प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, तसेच कृषी विकास अधिकारी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी साहाय्य करणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करणार आहेत.शेतकरी कर्जमाफी योजनेच्या शेतकºयांना लाभ घेता यावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक संपूर्ण मदत करणार आहे. त्यानुसार शेतकºयांनी कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी १५ सप्टेंबरपूर्वी आॅनलाईन अर्ज सादर करून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.आतापर्यंत १४ हजारावर शेतकºयांचे अर्जशेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने १ एप्रिल २००९ नंतरचे वाटप झालेले मात्र ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार असून, दीड लाखापेक्षा जास्त असलेल्या कर्जाची रक्कम भरणा केल्यास शासनाकडून दीड लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना मिळणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांचे सुमारे २६ हजार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २४ हजार अशा सुमारे ५० हजार शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजारापेक्षा जास्त शेतकºयांनी कर्जमाफी मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.