शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कन्हान नदीत सोडले जात आहे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान नदीमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. वीज प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान नदीमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. वीज प्रकल्प तसेच कोळसा खाणींसोबतच कारखाने व नळांतील पाणी विनाप्रक्रिया नदीमध्ये सोडले जात आहे, असा आरोप ग्रामोन्नती प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना भेटून निवेदन सादर केले.

कन्हान नदीच्या संगमात सर्व दिशांनी पाणी एकत्रित होते. परिसरातील कोळसा खाणीतून निघणारे पाणीदेखील तेथे सोडले जाते. कामठी, मौदा, खापरखेड़ा, सावनेर येथील ‘ड्रेनेज’चे पाणी आणि उद्योगांचे पाणीदेखील नदीत मिसळत आहे. सोबतच नदीच्या किनाऱ्यावर अंतिम संस्कारदेखील होत आहे. कोलार, बीना संगम व कन्हानमध्ये रक्षाविसर्जनदेखील होते. हरित लवादाने यासंदर्भात जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालनदेखील होत नसल्याचे चित्र आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील स्थानिक आस्थापनांना नोटीस जारी केली आहे, मात्र कारवाई झालेली नाही. जर नदीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव, मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, महेश काकड़े, गणेश भोंगाड़े, प्रवीण गोडे, नीलेश गाडगे, प्रवीण जुमले, राजू तुमसरे, ऋषभ बावनकर इत्यादी उपस्थित होते.

मनपा क्षेत्रातील ४०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया नाही

मनपा क्षेत्रामध्ये ७५० एमएलडी पाणी दूषित होत आहे. यातील ४०० एमएलडी पाणी प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडले जात आहे. मनपाकडे ३५० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कन्हान नदीचे प्रदूषण वाढत आहे, असा दावा ग्रामोन्नती प्रतिष्ठानने केला आहे.