शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

घराचे बांधकाम महागले

By admin | Updated: April 8, 2015 02:34 IST

सर्वसमान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न असते. परंतु आता ही बाब त्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. शहरातील बांधकामावर ३५ ते ५८ टक्के दरवाढ करण्यात आली आहे.

नागपूर : सर्वसमान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न असते. परंतु आता ही बाब त्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. शहरातील बांधकामावर ३५ ते ५८ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. बांधकामातील मोठी रक्कम महापालिकेला विकास शुल्क म्हणून द्यावी लागणार आहे. त्यामुळे सीताबर्डी, सिव्हिललाईन, महाल यासारख्या वर्दळीच्या भागात घर उभारण्याचे मध्यमवर्गींयांचे स्वप्न भंगणार आहे. फेब्रुवारी व मार्च महन्यात बांकामासाठी मनपाची अनुमती घेणाऱ्यांची संख्या कमी असते. परंतु मार्च महिना संपताच यासाठी लोकांची गर्दी होते. यासाठी मनपाच्या नगररचना विभागात आल्यानंतर मात्र दरवाढ बघून अनेकांना धक्काच बसला. हजारातील विकास शुल्क लाखावर गेल्याचे निदर्शनास आले. त्यातच नासुप्रनेही नवीन नियमाचा आधार घेत विकास शुल्क वसुलीला सुरुवात केली आहे. या विरोधात विदर्भ टॅक्स पेअर्स असोसिएशनने आवाज उठविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव डॉ. नितीन करीर व महापौर प्रवीण दटके यांना पत्र दिले आहे. या संदर्भात मंगळवारी व्हीटीएच्या शिष्टमंडळाने दटके यांची भेट घेतली. शिष्टमंडळात अध्यक्ष जे.पी.शर्मा, सचिव तेजिंदरसिग रेणू, विविध स्तरावर करण्यात आलेली करवृद्धी निदर्शनास आणली. (प्रतिनिधी)सभागृहात प्रस्ताव आणणारकरण्यात आलेली दरवाढ अन्यायकारक आहे. याबाबतचा प्रस्ताव सभागृहात आणून शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल असा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्रवीण दटके यांनी दिले.स्वप्न भंगणारनवीन शुल्काची आकारणी प्रति चौरस फुटावर केली जाते. यावर २०० ते ३०० प्रति चौरस फूट रक्कम खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण होणे कठीण झाल्याची माहिती रेणू यांनी दिली. शर्मा यांनी ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. शिषटमंडळात हेमंत त्रिवेदी, अमरजितसिंग चावला, राजेश कानुगो आदींचा समावेश होता.असे वाढले दरमागील सरकारने महाराष्ट्र अधिनियम २०१० पारित करून मनपा, नगरपालिका, औद्योगिक क्षेत्रातील लेआऊ ट व इमारत बांधकाम अनुमती देताना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम १०६६ च्या कलम १२४ बी अंतर्गत ही जाचक दरवाढ करण्यात आली आहे. मनपाच्या परिपत्रकानुसार नवीन दर २३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहे. त्यानुसार निवासी बांधकामासाठी रेडिरेकनरच्या २ टक्के तर व्यापारी कारणासाठी ४ टक्के विकास शुल्क द्यावा लागणार आहे. आता लाखात शुल्कमालमत्ताधारकांना आजवर हजारात विकास शुल्क भरावे लागत होते. आता हा आकडा लाखात गेला आहे. धरमपेठ भागात यापूर्वी १ हजार चौ. फूट जागेसाठी हजारात खर्च होता, आता ता लाखात गेला आहे. महाल, मानेवाडा, सीताबर्डी, धरमपेठ आदी भागात १ हजार चौ. फूट बांधकामासाठी ५५७४ रुपये शुल्क भरावे लागत होते. आता अनुक्र मे १०७५७८, १००३३२, १९००७३, १३९३५० शुल्क द्यावे लागणार आहे. अशीच शुल्कवाढ व्यापारी बांधकामावर आकारले जाणार आहे.