शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

मिहानध्ये होणार हेलिकॉप्टरची निर्मिती

By admin | Updated: August 26, 2015 03:00 IST

अनिल अंबानी यांचा अनिल धीरूभाई अंबानी समूह (एडीएजी) डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार असून, ...

‘रिलायन्स एरोस्ट्रक्चर’ला २९० एकर जागा : अनिल अंबानी २८ ला येणारमोरेश्वर मानापुरे  नागपूरअनिल अंबानी यांचा अनिल धीरूभाई अंबानी समूह (एडीएजी) डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्याअंतर्गत समूहाची उपकंपनी रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेडने नागपुरातील मिहान-सेझमध्ये २९० एकर जागा खरेदी केली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड यांच्यादरम्यान जागेसंदर्भात समन्वय करार २८ आॅगस्टला सायंकाळी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये होणार आहे. या समारंभात समूहाचे चेअरमन अनिल अंबानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’च्या आवाहनानुसार मिहानमध्ये प्रकल्प उभा राहत आहे. ‘एअर इंडिया एमआरओ’लगत जागाप्रारंभी कंपनीने १००० एकर जागेची मागणी केली होती. ही जागा कंपनीला विमानतळालगत हवी होती. पण एवढी जागा उपलब्ध नसल्यामुळे एमएडीसीने २९० एकर जागा देण्याची तयारी दर्शविली. वरिष्ठ स्तरावरील चर्चेनंतर एमएडीसी रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेडला एअर इंडियाच्या एमआरओलगत (पूर्वीचा बोर्इंग एमआरओ) २९० एकर जागा देणार आहे. कंपनी संरक्षण विभागाला लागणारी शस्त्रास्त्रे, हेलिकॉप्टर, युद्धसामग्री आणि अंतरिक्ष यानाची निर्मिती करणार आहे. युवकांना रोजगाराच्या संधीअनिल अंबानी यांच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे या क्षेत्रातील अभियांत्रिकी युवकांना रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहे. एम्स आणि आयआयएम यासारख्या केंद्रीय संस्थांमुळे सध्या मिहानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एमएडीसीकडे फार्मा आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांची विचारणा होत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह स्थानिक कंपन्याही मिहान-सेझमध्ये नव्या कंपन्या सुरू करण्यास उत्सुक आहे. इन्फोसिसने बांधकाम सुरू केले आहे तर टीसीएस कंपनीने बीपीओसाठी भरती सुरू केली आहे. विदेशी चलनाची बचतभारत सरकारने संरक्षण क्षेत्रात ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. या क्षेत्रात लागणारी शस्त्रास्त्रे देशात निर्मिती करण्यास केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. देशाला जवळपास ७० टक्के शस्त्रास्त्रे आणि उपकरणांची आयात करावी लागते. त्यासाठी विदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च होते. देशांतर्गत निर्मिती झाल्यास विदेशी चलन वाचेल आणि आर्थिक विकासाला हातभार लागेल.