शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

मानवी संवेदना व्यक्त करणारा ‘संविधान काव्य जागर’

By admin | Updated: December 5, 2014 00:41 IST

संविधान हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे आणि त्याला समान पातळीवर दर्जा देणारे आहे. संविधानाने प्रत्येक नागरिक सारखाच मानला. त्यात गरिबी, श्रीमंतीचा भेद नाही

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठनागपूर : संविधान हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारे आणि त्याला समान पातळीवर दर्जा देणारे आहे. संविधानाने प्रत्येक नागरिक सारखाच मानला. त्यात गरिबी, श्रीमंतीचा भेद नाही आणि जातीपातीही नाहीत. यात केंद्रस्थानी आहे तो केवळ माणूसच. पण अद्यापही माणसाला त्याचे अधिकार मिळविण्यासाठी धडपडावे लागते. आपल्या देशात भेदभावाचे लोण अद्यापही कायम आहे. संविधानाचे संपूर्ण पालन झाले तर हा देश माणुसकीने बहरलेला असेल. पण संविधान योग्य पद्धतीने पाळल्या जात नसल्याने वेगवेगळ्या पातळ्यांवर माणसाचे जगणे वेदनादायी झाल्याची खंत व्यक्त करीत मानवी संवेदना व्यक्त करणाऱ्या संविधान काव्य जागरने आज रसिकांच्या ह्रदयाला हात घातला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे २६ नोव्हेंबर हा संविधान दिन केवळ दिन म्हणून न पाळता संविधान सप्ताह म्हणून पाळण्यात आला. या अंतर्गत विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाच्यावतीने संविधान काव्य जागर या काव्यसंध्येचे आयोजन दीक्षांत सभागृहात करण्यात आले. या काव्यसंध्येच्या अध्यक्षस्थानी भाऊ पंचभाई होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मराठी विभागाचे डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. काव्यसंमेलनाचा प्रारंभ कवयित्री मनिषा साधू यांनी एका गझलने केला. समाजातील विषमतेचे दु:ख त्यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त करताना संविधान म्हणजे आई या भूमिकेतून त्यांनी काही ओळींनी भाष्य केले. यानंतर तीर्थराज कापगते यांनी ‘नवी गीता’आणि ‘युद्ध’ या कविता सादर केल्या. पण संविधानाच्या पालनातून निकोप समाजाचा आशावादही त्यांनी मांडला. ह्रदय चक्रधर यांनी संविधानाचे महत्त्व कवितेतून व्यक्त केले. सुनिता झाडे निसर्ग आणि निसर्गनियमांच्या माध्यमातून मानवी संवेदनांचा पट उलगडला. उल्हास मनोहर यांनी समाजाच्या दुटप्पीपणाची खंत व्यक्त करताना काही प्रश्न निर्माण केले. सुमती वानखेडे आजच्या एकूणच स्थितीवर मार्मिक भाष्य केले. वसंत वाहोकर व्यवस्थेच्या इतक्या भ्रष्टतेत गुलाब कसा फुलेल, असा प्रश्न करताना अशा स्थितीत कविताच येत नाही, असे मत मांडले. भाग्यश्री पेटकर यांनी स्त्रीच्या हळुवार भावनांचा पट व्यक्त केला. इ. मो. नारनवरे यांनी ‘काल आम्ही साहिला तो केवढा अंधार होता, केवढा रस्त्यावरी उन्माद अन अंगार होता’ अशी ओळींनी कविता गेय स्वरूपात सादर केली.या कार्यक्रमाचे संचालन मनिषा रिठे यांनी केले. संचालनात काही भावस्पर्शी ओळींनी त्यांनी कार्यक्रमाचा समा बांधला. याप्रसंगी भाऊ पंचभाई यांनी कवितांच्या सादरीकरणातून संविधान मानवी जगण्याला किती पूरक आहे, त्याची मांडणी केली. (प्रतिनिधी)