शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये सेना वाढविणार काँग्रेसची डोकेदुखी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

नागपूर : काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वबळाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत १६ ...

नागपूर : काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वबळाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत १६ ही जागेवर उमेदवारी देण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेनेच्या मतांची टक्केवारी लक्षात घेता करंभाड व बोथिया पालोरा या दोन जागेवर दावा केला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेस जिंकली असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढली तर काँग्रेसला फटका बसू शकतो.

२००७, २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेने ७ ते ८ सदस्य निवडून आणित सत्तेत वाटा मिळविला होता. शिवसेना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले वर्चस्व जिल्ह्यात कायम ठेवत होती; पण २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला खिंडार पडली. शिवसेनेचा एकच सदस्य निवडून आला. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काही ठिकाणी आघाडी करून लढली होती; पण शिवसेना स्वबळावर लढली. काही जागेवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती.

राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर जिल्हा परिषदेतही असाच प्रयोग झाला; पण सत्तेत सेनेच्या सदस्याला कुठलेही महत्त्व दिले गेले नाही. तसे तर काँग्रेसने राष्ट्रवादीच्या वाट्यालाही फारसं लागू दिले नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षात राष्ट्रवादी भूमिका सत्तेशी सकारात्मक दिसली नाही.

११ पैकी ७ जागांवर सेना लढली होती

- सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे ७, राष्ट्रवादीचे ४, भाजपाचे ४ व शेकापचा १ सदस्य आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रद्द झालेल्या ७ पैकी ५ सदस्यांच्या विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार होता. तर राष्ट्रवादीच्या ४ पैकी २ सदस्यांच्या विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार होता. शिवसेनेच्या मतांचीही टक्केवारी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे स्वबळाच्या नारा जिल्हा परिषदेत काँग्रेसची डोकेदुखी वाढविणारा ठरू शकतो.

- शिवसैनिक झाले अ‍ॅक्टीव्ह

२०१९ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत शिवसेनेला मोठा फटका बसला. जिल्ह्यात शिवसेना संपली अशीच अवस्था झाली होती; पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची कमान सांभाळल्यानंतर शिवसैनिक अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत. जिल्ह्याचे स्थानिक नेते आशिष जैस्वाल पुन्हा सेनेत परतले आहेत. शिवसेनेने जिल्ह्यात नवीन रचनाही केली आहे. जिल्हा परिषदेत नामुष्की टाळण्यासाठी किमान २ जागा निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना महाविकास आघाडीत असली तरी काहीच स्थान नाही. त्यामुळे सेनेला आपले अस्तित्व दाखविण्याची संधी आहे.