शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे सदस्य नाराज, समन्वयासाठी जि.प. अध्यक्षांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्यांची नाराजी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे व्यक्त होत आहे. पदाधिकारी आमचे ऐकतच नाहीत, सदस्यांची ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्यांची नाराजी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे व्यक्त होत आहे. पदाधिकारी आमचे ऐकतच नाहीत, सदस्यांची कामे होत नाहीत, विरोधी सदस्य पदाधिकाऱ्यांच्या जवळचे झाले आहेत, असा सदस्यांचा सूर आहे. जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये असंतुष्टांची फळी तयार झाली आहे. वरिष्ठांपर्यंत ही सर्व धुसफूस पोहोचली आहे. अशात निवडणुका लागल्या असून, असंतुष्टांची नाराजी निवडणुकीत अवघड ठरू नये म्हणून अध्यक्षांनी समेट घडवून आणण्यासाठी काँग्रेस सदस्यांची बैठक बोलावली होती.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विरोधकांची नव्हेतर, सत्तेतील सदस्यांची भीती वाटायला लागली आहे. नाराज सदस्यांचा एक ग्रुप तयार झाला आहे. हे सदस्य उघडपणे आपली नाराजी व्यक्त करीत नसले तरी संधी मिळाली तर आपली भडास नक्कीच काढत आहेत. एका ऑनलाइन सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ महिला सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या परिणामाची जाणीव त्यांना लगेच झाली. त्या व्यक्त होत नसल्या तरी एक खदखद आहेच. पारशिवनीत जि.प. सदस्य आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्याची झालेली हातापायी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर झालेली कारवाई यातून मोठी नाराजी पक्षात पसरली आहे. पॉलिमर दप्तर खरेदी, चर्चेतील विषय इतिवृत्तातून गायब होणे, ग्रामसेवकाची पदोन्नती, नवीन उपाध्यक्षाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार या सर्व विषयाला सत्ताधारी सदस्यांनीच खतपाणी घातले. निवडणुकीच्या तोंडावर हे विषय आणखी पेटू नयेत म्हणून सर्व नाराजांचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केला. सरपंच भवनात सदस्यांची बैठक घेऊन त्यांची नाराजी निस्तरण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.

- अनेकांची बैठकीला अनुपस्थिती

बैठकीसंदर्भात सर्वच सदस्यांना अध्यक्षांकडून सूचना देण्यात आली होती. असे असतानाही काही सभापतींसह अनेक सदस्य बैठकीला अनुपस्थित होते. प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, मिलिंद सुटे, महेंद्र डोंगरे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्याह १० ते १२ सदस्यांनीच बैठकीला उपस्थिती लावली.

- भाजपची झाली अंतर्गत बैठक

भाजपनेही निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा तयार केला आहे. ओबीसींवरील झालेल्या अन्यायाचा मुद्दा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. उमेदवारांनी जनसंपर्क वाढवावा, असा सल्ला पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारांना दिला.