शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

काँग्रेसचे सदस्य नाराज, समन्वयासाठी जि.प. अध्यक्षांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्यांची नाराजी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे व्यक्त होत आहे. पदाधिकारी आमचे ऐकतच नाहीत, सदस्यांची ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी सदस्यांची नाराजी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे व्यक्त होत आहे. पदाधिकारी आमचे ऐकतच नाहीत, सदस्यांची कामे होत नाहीत, विरोधी सदस्य पदाधिकाऱ्यांच्या जवळचे झाले आहेत, असा सदस्यांचा सूर आहे. जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये असंतुष्टांची फळी तयार झाली आहे. वरिष्ठांपर्यंत ही सर्व धुसफूस पोहोचली आहे. अशात निवडणुका लागल्या असून, असंतुष्टांची नाराजी निवडणुकीत अवघड ठरू नये म्हणून अध्यक्षांनी समेट घडवून आणण्यासाठी काँग्रेस सदस्यांची बैठक बोलावली होती.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विरोधकांची नव्हेतर, सत्तेतील सदस्यांची भीती वाटायला लागली आहे. नाराज सदस्यांचा एक ग्रुप तयार झाला आहे. हे सदस्य उघडपणे आपली नाराजी व्यक्त करीत नसले तरी संधी मिळाली तर आपली भडास नक्कीच काढत आहेत. एका ऑनलाइन सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ महिला सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या परिणामाची जाणीव त्यांना लगेच झाली. त्या व्यक्त होत नसल्या तरी एक खदखद आहेच. पारशिवनीत जि.प. सदस्य आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्याची झालेली हातापायी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर झालेली कारवाई यातून मोठी नाराजी पक्षात पसरली आहे. पॉलिमर दप्तर खरेदी, चर्चेतील विषय इतिवृत्तातून गायब होणे, ग्रामसेवकाची पदोन्नती, नवीन उपाध्यक्षाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार या सर्व विषयाला सत्ताधारी सदस्यांनीच खतपाणी घातले. निवडणुकीच्या तोंडावर हे विषय आणखी पेटू नयेत म्हणून सर्व नाराजांचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केला. सरपंच भवनात सदस्यांची बैठक घेऊन त्यांची नाराजी निस्तरण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.

- अनेकांची बैठकीला अनुपस्थिती

बैठकीसंदर्भात सर्वच सदस्यांना अध्यक्षांकडून सूचना देण्यात आली होती. असे असतानाही काही सभापतींसह अनेक सदस्य बैठकीला अनुपस्थित होते. प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, मिलिंद सुटे, महेंद्र डोंगरे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्याह १० ते १२ सदस्यांनीच बैठकीला उपस्थिती लावली.

- भाजपची झाली अंतर्गत बैठक

भाजपनेही निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा तयार केला आहे. ओबीसींवरील झालेल्या अन्यायाचा मुद्दा भाजपच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. उमेदवारांनी जनसंपर्क वाढवावा, असा सल्ला पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारांना दिला.