शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

दिल्लीत आपमुळे कॉंग्रेसचा पराभव, दिग्विजय सिंह यांची टीका

By admin | Updated: April 26, 2017 21:05 IST

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी आप सोबतच ईव्हीएम प्रणालीवर जोरदार हल्लाबोल केला. आप मुळेच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूकांत कॉंग्रेसचा

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 -   दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. बुधवारी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी  आप सोबतच  ईव्हीएम  प्रणालीवर जोरदार हल्लाबोल केला.  आप मुळेच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूकांत कॉंग्रेसचा पराभव झाल्याचा त्यांनी आरोप केला. सोबतच  ईव्हीएम प्रणालीवरदेखील त्यांनी जोरदार टीका केली.नागपुरात आले असता दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. दिल्ली महानगरपालिका निवडणूकांत ह्यआपह्णमुळे भाजपाला फायदा झाला व कॉंग्रेसचा पराभव झाला. गोव्यामध्ये  आपचा सफाया झाला. परिणामी कॉंग्रेस अव्वल स्थानी राहिली.  आपची स्थापनाच भाजपाला मदत करण्यासाठी झाली आहे, असे सिंह म्हणाले. निवडणूकांमध्ये  ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले आहे. यावेळी त्यांनी  ईव्हीएमवरदेखील भाष्य केले.  ईव्हीएमला  हॅक करणे कठीण नाही. विकसित देशांप्रमाणे आपल्या देशातदेखील मतपत्रिकेच्या माध्यमानेच निवडणूक घेतली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.नक्षलग्रस्त भागात आदिवासींना सक्षम करावे

छत्तीसगडमधील सुकमा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अप्रत्यक्षपणे या प्रकाराला तेथील राज्य सरकारला जबाबदार ठरविले. या भागातील तेंदुपत्ता व दारुचे ठेकेदार हे नक्षलवादी व पोलीसांमधील दुवा आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकाळात तेथील ठेकेदारी पद्धती बंद झाली होती. मात्र भाजपाने ही पद्धत परत सुरू केली. जोपर्यंत ही प्रणाली सुरू आहे, तोपर्यंत नक्षलवाद संपुष्टात येऊ शकत नाही. नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना सक्षम करण्याची आवश्यकता आहे. नक्षलवादी व शासनाच्या मध्ये त्यांची कुचंबणा होते, असे दिग्विजय सिंह म्हणाले.