शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीच्या काळात सक्तीची वीज बिल वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बेलाेना : सततची नापिकी आणि दीड वर्षापासून सुरू असलेले काेराेना संक्रमण यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या आर्थिक संकटात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेलाेना : सततची नापिकी आणि दीड वर्षापासून सुरू असलेले काेराेना संक्रमण यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या आर्थिक संकटात भर पडली आहे. त्यातच महावितरण कंपनीने अवाजवी विजेचे दर वाढवून बिलाची आकारणी व सक्तीची वसुली करायला सुरुवात केली आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सामान्य नागरिकांना पावसाळ्यात रात्र अंधारात काढण्याची वेळ ओढवली आहे.

काेराेना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दीर्घकाळ लाॅकडाऊन जाहीर केल्याने ग्रामीण भागातील छाेटे-माेठे उद्याेग ठप्प झाले असून, छाेटे व्यावसायिक आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रतिकूल वातावरण आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे उत्पादन घटत असून, उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच बाजारात शेतमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी ताेटा पडत आहे. एवढेच नव्हे तर बहुतांश शेतकऱ्यांना मागील वर्षीसाेबतच याही वर्षी दुबार पेरणीला सामाेरे जावे लागले. किडी व नैसर्गिक कारणांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाईदेखील शासन द्यायला तयार नाही.

या प्रतिकूल परिस्थितीत राज्य शासनाने विजेचे दर वाढविले आहे. त्यातच बिलांची अवाजवी आकारणी करून महावितरण कंपनीने वीज बिलांची सक्तीने वसुली करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी घराेघरी जाऊन नागरिकांना वीज बिल भरण्याची सूचना करीत आहेत. आर्थिक अडचणींमुळे अनेकांना वेळीच वीज बिल भरणे शक्य न झाल्याने थकीत बिलाची रक्कम वाढत गेली.

अनेकांना बिलाची माेठी रक्कम भरणे शक्य न झाल्याने त्यांच्याकडील वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटाही महावितरण कंपनीने सुरू केला आहे. त्यामुळे संबंधितांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता, राज्य शासनाने सक्तीची वीज बिल वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.