शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दक्षतेतून समतेचा संदेश

By admin | Updated: October 24, 2015 03:24 IST

नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली अन् पोलीस सतर्क असले तर गुन्हेगार कितीही मोठा असू दे, तो माशी मारण्याचीही हिंमत दाखवणार नाही.

कसला गोंधळ नाही : कोणता गैरप्रकारही नाहीनागपूर : नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली अन् पोलीस सतर्क असले तर गुन्हेगार कितीही मोठा असू दे, तो माशी मारण्याचीही हिंमत दाखवणार नाही. पवित्र दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातून त्याची प्रचिती आली. देशविदेशातून लाखोंच्या संख्येत नागपुरात लोक आले. मात्र, गंभीर गुन्हा तर सोडा साधा खिसा कापण्याचाही गैरप्रकार या भागात घडला नाही. पोलिसांचा नियोजनपूर्वक बंदोबस्त अन् नागरिकांची सतर्कता या दोहोंमुळेच हे शक्य झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा संदेश देशभर देण्यासाठी पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायी जमतात. यावर्षीही ते आले. विदेशातून मान्यवर पाहुणे आले असतानाच बाबासाहेबांच्या भूमीवर डोके टेकवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृद्धही आले. त्यात उच्चशिक्षितांसोबत निरक्षरांचाही समावेश होता. महानगरात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांपासून तो गावखेड्यात वर्षभर कबाडकष्ट करणाऱ्यांचाही त्यात समावेश होता. श्रीमंत, मध्यमवर्गीय गरीब, अतिगरीब अशा सर्वच वर्गातील ही मंडळी होती. येथे ते कुणाच्या नेतृत्वात येण्याचा अथवा कुणी त्यांना आणण्याचाही प्रश्न नव्हता. बाबासाहेबांच्या प्रेरणेने ते स्वयंस्फूर्तीने, स्वखर्चानेच येथे आले होते. त्यांच्या स्वयंशिस्तीचे, स्वाभिमानाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नागपुरातील आपल्या दीड-दोन दिवसाच्या वास्तव्यात त्यांनी कुणाशी वाद घातला नाही. कुणी गोंधळ केला नाही. आपल्या जबाबदारीचे भान राखताना त्यांनी आजूबाजूच्यांची गैरसोय होणार नाही, त्याचीही दखल घेतली. बालकं, वृद्ध, निरक्षरांची काळजी घेतली. त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या औषधापासून त्यांना गावाला जाण्यासाठी कुठून, कधी, कोणते साधन आहे, त्याबाबत मार्गदर्शनही केले. म्हणतात की, गर्दीत हौसे, नवसे, गवसेही असतात. मात्र, येथे केवळ बाबासाहेबांचे सच्चे अनुयायीच असल्यामुळे कुणा चोर-भामट्याला चोरी, उचलेगिरी करण्याची संधीच मिळाली नाही. त्याचमुळे दीक्षाभूमी आणि आजूबाजूच्या परिसरात लाखोंची गर्दी असूनही कुणाची बॅग चोरीला गेली नाही. कुणाचा खिसा कापला गेला नाही. कुणाचा दागिना हिसकावला गेला नाही. कुणाचा कुणासोबत वाद, हाणामारी झाली नाही. बाबासाहेबांच्या विचाराने संस्कारित झालेल्या या भीमसैनिकांनी त्यांच्या सहकार्यासाठी असलेल्या सुरक्षा यंत्रणांच्या कोणत्या घटकासोबत वादही घातला नाही अन् कुरबुरही केली नाही. (प्रतिनिधी)