शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

दक्षतेतून समतेचा संदेश

By admin | Updated: October 24, 2015 03:24 IST

नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली अन् पोलीस सतर्क असले तर गुन्हेगार कितीही मोठा असू दे, तो माशी मारण्याचीही हिंमत दाखवणार नाही.

कसला गोंधळ नाही : कोणता गैरप्रकारही नाहीनागपूर : नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली अन् पोलीस सतर्क असले तर गुन्हेगार कितीही मोठा असू दे, तो माशी मारण्याचीही हिंमत दाखवणार नाही. पवित्र दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातून त्याची प्रचिती आली. देशविदेशातून लाखोंच्या संख्येत नागपुरात लोक आले. मात्र, गंभीर गुन्हा तर सोडा साधा खिसा कापण्याचाही गैरप्रकार या भागात घडला नाही. पोलिसांचा नियोजनपूर्वक बंदोबस्त अन् नागरिकांची सतर्कता या दोहोंमुळेच हे शक्य झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा संदेश देशभर देण्यासाठी पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायी जमतात. यावर्षीही ते आले. विदेशातून मान्यवर पाहुणे आले असतानाच बाबासाहेबांच्या भूमीवर डोके टेकवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृद्धही आले. त्यात उच्चशिक्षितांसोबत निरक्षरांचाही समावेश होता. महानगरात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांपासून तो गावखेड्यात वर्षभर कबाडकष्ट करणाऱ्यांचाही त्यात समावेश होता. श्रीमंत, मध्यमवर्गीय गरीब, अतिगरीब अशा सर्वच वर्गातील ही मंडळी होती. येथे ते कुणाच्या नेतृत्वात येण्याचा अथवा कुणी त्यांना आणण्याचाही प्रश्न नव्हता. बाबासाहेबांच्या प्रेरणेने ते स्वयंस्फूर्तीने, स्वखर्चानेच येथे आले होते. त्यांच्या स्वयंशिस्तीचे, स्वाभिमानाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नागपुरातील आपल्या दीड-दोन दिवसाच्या वास्तव्यात त्यांनी कुणाशी वाद घातला नाही. कुणी गोंधळ केला नाही. आपल्या जबाबदारीचे भान राखताना त्यांनी आजूबाजूच्यांची गैरसोय होणार नाही, त्याचीही दखल घेतली. बालकं, वृद्ध, निरक्षरांची काळजी घेतली. त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या औषधापासून त्यांना गावाला जाण्यासाठी कुठून, कधी, कोणते साधन आहे, त्याबाबत मार्गदर्शनही केले. म्हणतात की, गर्दीत हौसे, नवसे, गवसेही असतात. मात्र, येथे केवळ बाबासाहेबांचे सच्चे अनुयायीच असल्यामुळे कुणा चोर-भामट्याला चोरी, उचलेगिरी करण्याची संधीच मिळाली नाही. त्याचमुळे दीक्षाभूमी आणि आजूबाजूच्या परिसरात लाखोंची गर्दी असूनही कुणाची बॅग चोरीला गेली नाही. कुणाचा खिसा कापला गेला नाही. कुणाचा दागिना हिसकावला गेला नाही. कुणाचा कुणासोबत वाद, हाणामारी झाली नाही. बाबासाहेबांच्या विचाराने संस्कारित झालेल्या या भीमसैनिकांनी त्यांच्या सहकार्यासाठी असलेल्या सुरक्षा यंत्रणांच्या कोणत्या घटकासोबत वादही घातला नाही अन् कुरबुरही केली नाही. (प्रतिनिधी)