शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षतेतून समतेचा संदेश

By admin | Updated: October 24, 2015 03:24 IST

नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली अन् पोलीस सतर्क असले तर गुन्हेगार कितीही मोठा असू दे, तो माशी मारण्याचीही हिंमत दाखवणार नाही.

कसला गोंधळ नाही : कोणता गैरप्रकारही नाहीनागपूर : नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली अन् पोलीस सतर्क असले तर गुन्हेगार कितीही मोठा असू दे, तो माशी मारण्याचीही हिंमत दाखवणार नाही. पवित्र दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातून त्याची प्रचिती आली. देशविदेशातून लाखोंच्या संख्येत नागपुरात लोक आले. मात्र, गंभीर गुन्हा तर सोडा साधा खिसा कापण्याचाही गैरप्रकार या भागात घडला नाही. पोलिसांचा नियोजनपूर्वक बंदोबस्त अन् नागरिकांची सतर्कता या दोहोंमुळेच हे शक्य झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा संदेश देशभर देण्यासाठी पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायी जमतात. यावर्षीही ते आले. विदेशातून मान्यवर पाहुणे आले असतानाच बाबासाहेबांच्या भूमीवर डोके टेकवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृद्धही आले. त्यात उच्चशिक्षितांसोबत निरक्षरांचाही समावेश होता. महानगरात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांपासून तो गावखेड्यात वर्षभर कबाडकष्ट करणाऱ्यांचाही त्यात समावेश होता. श्रीमंत, मध्यमवर्गीय गरीब, अतिगरीब अशा सर्वच वर्गातील ही मंडळी होती. येथे ते कुणाच्या नेतृत्वात येण्याचा अथवा कुणी त्यांना आणण्याचाही प्रश्न नव्हता. बाबासाहेबांच्या प्रेरणेने ते स्वयंस्फूर्तीने, स्वखर्चानेच येथे आले होते. त्यांच्या स्वयंशिस्तीचे, स्वाभिमानाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नागपुरातील आपल्या दीड-दोन दिवसाच्या वास्तव्यात त्यांनी कुणाशी वाद घातला नाही. कुणी गोंधळ केला नाही. आपल्या जबाबदारीचे भान राखताना त्यांनी आजूबाजूच्यांची गैरसोय होणार नाही, त्याचीही दखल घेतली. बालकं, वृद्ध, निरक्षरांची काळजी घेतली. त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या औषधापासून त्यांना गावाला जाण्यासाठी कुठून, कधी, कोणते साधन आहे, त्याबाबत मार्गदर्शनही केले. म्हणतात की, गर्दीत हौसे, नवसे, गवसेही असतात. मात्र, येथे केवळ बाबासाहेबांचे सच्चे अनुयायीच असल्यामुळे कुणा चोर-भामट्याला चोरी, उचलेगिरी करण्याची संधीच मिळाली नाही. त्याचमुळे दीक्षाभूमी आणि आजूबाजूच्या परिसरात लाखोंची गर्दी असूनही कुणाची बॅग चोरीला गेली नाही. कुणाचा खिसा कापला गेला नाही. कुणाचा दागिना हिसकावला गेला नाही. कुणाचा कुणासोबत वाद, हाणामारी झाली नाही. बाबासाहेबांच्या विचाराने संस्कारित झालेल्या या भीमसैनिकांनी त्यांच्या सहकार्यासाठी असलेल्या सुरक्षा यंत्रणांच्या कोणत्या घटकासोबत वादही घातला नाही अन् कुरबुरही केली नाही. (प्रतिनिधी)