शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंबाबत राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे.

ठळक मुद्देकुलसचिवपदाच्या निवड प्रक्रियेवरुन तापले वातावरणखर्च कुलगुरूंकडून वसूल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे. डॉ. नीरज खटी यांचा ‘प्रोबेशन’ कालावधी पूर्ण झाला नसल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना होती. तरीदेखील त्यांची अगोदर निवड करणे व त्यानंतर त्यांना ‘लिन’ नाकारणे हा प्रक्रार करण्यात आला. यामुळे विद्यापीठाचा बहुमूल्य वेळ व पैसा वाया गेला आहे. या निवड प्रक्रियेचा पूर्ण खर्च कुलगुरूंकडूनच वसूल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.कुलसचिवपदाच्या निवडीसाठी विद्यापीठात सात महिन्यांपासून प्रक्रिया सुरू होती. अखेर निवड समितीने डॉ. नीरज खटी यांची निवड केली. यानंतर प्रशासनावर राजकीय दबावदेखील आला. ‘लिन’ मिळू शकणार नसल्याने डॉ. खटी यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुलगुरूंना डॉ. खटी यांच्यासंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्ण माहिती होती. अशास्थितीत निवड झाल्यानंतर हे मुद्दे कसे काय उपस्थित झाले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सुनील मिश्रा यांनी या मुद्यावरून कुलगुरूंचीच तक्रार राज्यपालांकडे केली आहे. डॉ. नीरज खटी यांची ‘लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट आॅफ टेक्नॉलॉजीह्णमध्ये रसायनशास्त्र विषयाचे प्रोफेसर म्हणून निवड करण्यात आली. ‘लिन’संदर्भातील नियमांची डॉ. खटी व डॉ. काणे या दोघांनाही माहिती होती. तरीदेखील त्यांचा अर्ज छाननी समितीने ग्राह्य धरला व त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. यानंतर त्यांची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खुद्द कुलगुरू यांनीच निवड केली. नियुक्तीनंतर डॉ. खटी यांना ‘लिनह्ण नाकारून ते पद त्यांनी स्वीकारू नये, अशी व्यवस्था केली. यातूनच हा प्रकार जाणीवपूर्वक झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास तीन लाख रुपयांचा खर्च झाला. हा सर्व खर्च जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या निधीतून झाला आहे. त्यामुळे हा पैसा कुलगुरूंकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी मिश्रा यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ