शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५६ वर्षांच्या कालखंडात सभापतिविनाच समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:14 IST

अभय लांजेवार लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : नगरपालिकेची स्थापना सन १८६७ ला झाली. ब्रिटिशकाळातील जुलमी ऐतिहासिक घटनांची साक्षीदार उमरेड ...

अभय लांजेवार

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : नगरपालिकेची स्थापना सन १८६७ ला झाली. ब्रिटिशकाळातील जुलमी ऐतिहासिक घटनांची साक्षीदार उमरेड पालिका आहे. गोऱ्यांच्या काळात विविध समित्यांच्या सभापतींची निवड होत नव्हती. अलीकडे महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ या अधिनियमानुसार विविध विषय समिती सभापतींच्या निवडीचा प्रवास सुरू झाला. एकूणच सन १९६५ ते २०२१ या तब्बल ५६ वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच उमरेड पालिकेत दोन समितींच्या सभापतिविनाच सभागृह चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.

सोमवारी (दि.२२) झालेल्या विशेष सभेत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिक्षण तसेच महिला व बालकल्याण या दोन समितीच्या सभापती पदावर कुणाचीही निवड होऊ शकली नाही. एकूण २५ नगरसेवकांपैकी एकाही सदस्याचा अर्ज या पदासाठी आलाच नाही, म्हणून सभापतींची निवड झाली नाही. ही नामुष्की पालिकेच्या कार्यकाळात पहिल्यांदाच घडल्याने दोन्ही समित्यांच्या कामकाजाचा ताल बिघडेल, असा आरोप आता सर्व स्तरातून सुरू झाला आहे.

सन २०१६-१७ ला उमरेड पालिकेची निवडणूक झाली. यामध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होती. भाजपच्या विजयलक्ष्मी भदोरिया यांना उमरेडकरांनी कौल दिला. सोबतच तब्बल १९ नगरसेवकांनी काॅंग्रेसच्या उमेदवारांना चारीमुंड्या चीत करीत विजय खेचून आणला. या निवडणुकीत काॅंग्रेस केवळ सहा नगरसेवकांवर थांबली. तुम्ही आम्हाला मते द्या, आम्ही तुम्हाला ‘विकास’ देणार, असा शब्द प्रचार सभेत दिल्यानंतर उमरेडकरांनी भरभरून मते दिली.

काही वर्षे अत्यंत नियोजनबद्ध पालिकेचा कारभार चालला. वर्षभरापासूनच ताल बिघडला. अशा कोणत्या महत्त्वपूर्ण प्रश्नावरून आणि गंभीर समस्येवरून हे राजकीय नाट्य पालिकेत घडत आहे, ही बाब उमरेडकरांना कळलीही नाही आणि वळलीही नाही. केवळ एकमेकांचा वचपा काढण्यासाठीच उमरेड पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू झाला असल्याची बोंब या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर होत आहे. नगरसेवकच हमरीतुमरीवर आले असून, नागरिकांसाठी या बाबी चिंताजनक ठरत आहेत. सभापतींची निवड न होण्याचा हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला आहे. तत्पूर्वी शिक्षण आणि महिला व बालकल्याण समितीचे कामकाज चालणार कसे आणि किती दिवस या समित्यांचे सभापतिपद रिक्त राहील, असा सवाल नागरिकांचा आहे.

....

प्रश्न व समस्यांसाठी भांडा

उमरेड पालिकेतील अंतर्गत राजकीय कलहामुळे ‘विकास’कामाचा बळी जात असून, येत्या काही महिन्यात उमरेड पालिकेत राजकीय भूकंप झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही, असेही बोलल्या जात आहे. येत्या वर्षभरात उमरेड पालिकेची निवडणूक होणार असल्याने निदान आता तरी जनतेच्या कामासाठी, त्यांच्या प्रश्न आणि समस्यांसाठी नगरसेवकांनी भांडावे, असा सूर उमरेडकरांमध्ये व्यक्त होत आहे.

....

उमरेडकर बुचकळ्यात

उमरेड पालिकेतील अंतर्गत राजकीय नाट्यमय घडामोडी २६ नोव्हेंबर २०२० च्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नागरिकांसमोर उघडकीस आल्या. यामध्ये भाजपाकडूनच गंगाधर फलके आणि अरुणा हजारे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. फलके यांना काँग्रेसच्या पाच नगरसेवकांच्या आशीर्वादासह १७ मते मिळाली. हजारे यांना नऊ मते मिळाली. काँग्रेसचे सुरेश चिचमलकर यांना शून्य मत मिळाले. या संपूर्ण निवडणुकीत कुणाचा फायदा झाला हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावरून कोणकोणत्या पक्षातील या मुद्यावरून उमरेडकर बुचकळ्यात अडकलेत आणि इथूनच उमरेड पालिकेत राजकीय कलहाची ठिणगीसुद्धा पडली. तूर्त तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला केवळ विकास कामे हवी आहेत, असा सूर आळवला जात आहे.