शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या-विमुक्तांसाठी १३ विभागाच्या सचिवांची समिती

By admin | Updated: November 3, 2014 00:43 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी अपराधी जमाती कायदा (१८७१) आणून त्यात १९८ जमातींचा समावेश केला. या जाती जन्मजात अपराधी असल्याच्या जाहीर केल्या. स्वातंत्र्यानंतर अपराधी

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी अपराधी जमाती कायदा (१८७१) आणून त्यात १९८ जमातींचा समावेश केला. या जाती जन्मजात अपराधी असल्याच्या जाहीर केल्या. स्वातंत्र्यानंतर अपराधी जमाती कायद्याचे नाव बदलून भारत सरकारने ३१ आॅगस्ट १९५२ मध्ये सराईत गुन्हेगारी कायदा असा बदल केला. परंतु नाव बदल करूनही कायद्यातील तरतुदी कायम आहेत. आजही या जमातीच्या बहुतांश बाया-माणसांवर गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात मोतीरामजी राठोड यांनी या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने यासंदर्भात राज्यातील १३ विभागांच्या सचिवांची समिती गठित करून अहवाल मागितला आहे. गावखेड्यात राहणारा पारधी, सांसी, मांग-गारुडी, सिकलगर यांना गावात, शहरात झालेल्या चोऱ्या, अपराधाच्या घटना प्रकरणात संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतात. त्यांना जेलमध्ये डांबले जाते. वर्षानुवर्षे त्यांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतात. राज्यात या जमातींची ११ टक्के लोकसंख्या आहे. विकासाची, शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. राज्याच्या निर्मितीला ५० वर्षे लोटल्यानंतरही या जमाती लाचारीचे जीवन जगत आहे. पोलिसांच्या रोषाला बळी पडत आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने विमुक्त-भटक्यांवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी, त्यांचा सामाजिक विकास करण्यासाठी ३० आॅक्टोबरपर्यंत १३ विभागाच्या सचिवांची समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गृह, नियोजन, विधी व न्याय, महसूल व वन, उच्च व तंत्र शिक्षण, सामान्य प्रशासन, ग्राम विकास, रोजगार व स्वयंरोजगार, आदिवासी विकास, शिक्षण विभाग आदी विभागांच्या सचिवांची समिती गठित झाली. या समितीची बैठक २७ आॅक्टोबर रोजी पार पडली. बैठकीला याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांच्यासह सर्व भटक्या-विमुक्तांच्या संघटनांच्या मागणीचे संयुक्त निवेदन समितीला सादर केले. बैठकीत विभागनिहाय मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सर्वांना मोफत शिक्षण, एससी-एसटीनुसार शिष्यवृत्ती, घरकूल योजना, बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आर्थिक तरतूद, स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगळे आरक्षण, अनुसूचित जमातीचा घटनात्मक दर्जा द्यावा, या मागण्यांसंदर्भात संघर्ष वाहिनीचे संयोजक दीनानाथ वाघमारे, आमदार हरिभाऊ राठोड, निर्माण संस्थेचे संतोष जाधव, लक्ष्मण गायकवाड, वैशाली भांडवलकर, भरत विटकर यांनी बैठकीत आपापली मते मांडली. येत्या १० नोव्हेंबरला समितीद्वारे योजनांचा मसुदा, समितीने सुचविलेल्या शिफारशी आदींचा अहवाल उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात येईल. (प्रतिनिधी)