शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

आयुक्तांच्या बजेटमुळे विकासाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २०२० या वर्षाचा सुधारित तर २०२१-२१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २०२० या वर्षाचा सुधारित तर २०२१-२१ या वर्षाचे प्रस्तावित बजेट दिले. बजेटच्या माध्यमातून शहर विकासाच्या कामांना गती मिळेल, आयुक्त विकासाच्या नवीन संकल्पाना मांडतील, अशी अपेक्षा होती. मात्र आयुक्तांनी मनपाच्या उत्पन्नात घट झालेली नसतानाही बजेट कमी रकमेचे दिले. सुधारित बजेटमध्ये महसुली व भांडवली खर्चासाठी २६.३४ कोटी तर प्रस्तावित बजेटमध्ये ३०.५२ कोटींची तरतूद केली आहे. शहरातील रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्यासाठी फक्त १.७९ कोटींची तरतूद केली. वास्तविक याच्या निविदा १२ कोटीच्या आहेत. बजेटमध्ये विकास कामासाठी अपेक्षित तरतूद नसल्याने विकास कामांना ब्रेक लागल्याचा दावा मनपातील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, माजी अध्यक्ष विजय झलके उपस्थित होते.

मनपाचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणी कर, बाजार, स्थावर विभाग, स्थानिक संस्था कर व जाहिरात विभागाच्या उत्पन्नात घट झालेली नाही. असे असतानाही नगरसेवकांना प्रभागातील आवश्यक विकास कामासाठी निधी उपलब्ध केला नाही. आयुक्तांनी फक्त महापौर निधी, वॉर्ड निधी, झोन निधी, स्थायी समिती व फिक्स प्रायारिटी अशा स्वरूपाच्या शीर्षकांतर्गत खर्चाला मंजुरी दिली आहे. यात मोजकाच निधी असल्याने शहरातील विकास कामे थांबली असल्याचा आरोप अविनाश ठाकरे यांनी केला.

२०१९-२० या वर्षात २,२५७ कोटींचे उत्पन्न झाले. मनपाने यातून २,११९ कोटींचा खर्च केला. तर २०२०-२१ या वर्षात २३ फेब्रुवारीपर्यंत मनपाला १,७४६ कोटींचा महसूल प्राप्त झाला. यातून १,५७७ कोटी खर्च केले. मालमत्ता करातून ४३ कोटी, पाणी करातून २० कोटी, शासकीय अनुदानातून १०० कोटी अधिक मिळाले. त्यानंतरही विकासासाठी निधी नाही.

.....

असे आहेत ठाकरे यांचे आरोप

- विकासासाठी पैसे नसताना कंत्राटदारांना २०१९-२० वर्षात ८२४ कोटी तर २०२०-२१ वर्षात ५८६ कोटी कसे दिले.

- मनपा आयुक्त राज्य सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यांना नागरिकांच्या समस्यांबाबत काही देणे-घेणे नाही.

- प्रमुख स्रोतातून मनपाला अपेक्षित उत्पन्न झाले. त्यानंतरही विकासासाठी निधी नसल्याचे सांगतात.

- आघाडी सरकारच्या काळात गेल्या वर्षात मनपाच्या शासकीय अनुदानात मोठी कपात.