शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

सिंचनासाठी १५ शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्या इशारा

By admin | Updated: December 12, 2014 00:32 IST

वीज वितरण कंपनीच्या मनमानीमुळे सिंचनाचा लाभ घेता येत नाही. परिणामी सततच्या नुकसानीला कंटाळून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा बोराळा रोहित्राशी संलग्न त्रस्त शेतकरी

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र : महावितरणची मनमानी, रब्बी पिकांचीही हानीचांदूरबाजार : वीज वितरण कंपनीच्या मनमानीमुळे सिंचनाचा लाभ घेता येत नाही. परिणामी सततच्या नुकसानीला कंटाळून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा बोराळा रोहित्राशी संलग्न त्रस्त शेतकरी श्रीमंत शेकार यांच्यासह पंधरा शेतकऱ्यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून दिला आहे. पावसाचा अनियमितपणा, नापिकी, दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकरी विहिरीतील पाण्याने रबी पीक टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना विहिरीत पाणी असूनही सिंचनाची सोय करणे शक्य होत नाही. परिणामी शेतीची हानी होते. नादुरुस्त वीज यंत्रणा व जळालेल्या रोहित्राला पर्याय नसल्याने रबी पीकही हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. चांदूरबाजार ते अमरावती मार्गावरील शेकार यांच्या शेतातील रोहित्रावर मर्यादेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच हे रोहित्र वारंवार निकामी होते. परिणामी या रोहित्रावर अवलंबून असलेल्या सुमारे २६ शेतकऱ्यांचे सिंचन रखडले आहे. आधीच खरीप पिके हातून गेली. तालुक्यात ३५ दिवसांत तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बोराळा रोहित्राशी संलग्न १५ शेतकऱ्यांनी नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करुन यावरील जादा जोडण्या आठवडाभरात काढून नवीन रोहित्र देण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात या १५ शेतकऱ्यांनी दिला आहे.