शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

नाणे टंचाई, व्यापारी त्रस्त

By admin | Updated: April 26, 2015 02:24 IST

नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आल्याचे बाजारात चित्र आहे.

नागपूर : नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आल्याचे बाजारात चित्र आहे. नाणे टंचाईला व्यापारी वैतागले असून काहीजण टक्केवारीने नाण्यांचा काळाधंदा करीत आहेत. भयानक नाणे टंचाईचा फायदा घेत काही मंडळी नाण्यांची टक्केवारीने विक्री करीत आहेत. त्यांचा नाणे विक्रीचा एक स्वतंत्र व्यवसायच बनला आहे. ही मंडळी विविध देवस्थान, भिकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साचलेली नाणी मिळवितात. नाणेनुसार वेगळी करून १०० रुपये किमतीच्या थैल्या बनवितात. व्यापाऱ्यांना नाण्यांची गरज भासते हे लक्षात घेऊन अशा व्यापाऱ्यांना ही मंडळी नाण्यांची थैली १० ते २० टक्के दर आकारून विकत देतात. असा हा काळाधंदा शहरात राजरोजपणे चालू आहे. आता ५० पैशालाही फारशी किंमत उरली नाही. नाण्यांसह नोटांच्या बाबतीतही तसेच घडले. एक आणि दोन रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर गेल्या, तर पाच रुपयांची नोट जरी अस्तित्वात असली तरी या नोटा अनेक वर्षांपासून रिझर्व्ह बँकेकडून नव्या कोऱ्या करकरीत स्वरूपात येणे बंद झाले. त्यामुळे पाच रुपयांच्या जुन्या फाटक्या नोटा पुन्हा पुन्हा बाजारात फिरू लागल्या.रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा कोषागार शाखेला वर्षांतून तीन वेळा नवीन नोटा आणि नाण्यांचा पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे, हजार रुपये मूल्य असलेल्या नवीरन नोटा सातत्याने चलनात येत असतात. त्याचप्रमाणे एक रुपया, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयांच्या नवीन नाण्यांचा वर्षांतून तीन वेळा पुरवठा केला जातो, अशी परिस्थिती असतानाही बाजारपेठेत चिल्लरचा प्रश्न गंभीर का बनला याचा शोध घेतला असता, अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. नवीन नोटा आणि नाणी प्रथमत: जेव्हा बाजारात येतात तेव्हा नाविन्यपूर्ण कुतूहलापोटी चलनात हस्ते, परहस्ते फिरतच नाहीत, उलट त्यांचा संग्रह केला जातो. त्यामुळे आजही आपल्याला बाजारात १० रुपयांची नवीन नाणी चलनात येऊनसुद्धा पाहायला मिळत नाहीत. विविध मंदिरांच्या दानपेटीत भाविक चिल्लरची नाणी आवर्जून टाकतात. अनेक हॉटेल्समधून चिल्लर नाही, असे कारण सांगून त्याऐवजी चक्क चॉकलेटच ग्राहकांच्या हाती ठेवले जाते. अशा तऱ्हेने नाण्यांच्या टंचाईमुळे चॉकलेटचा धंदाही भरभराटीस आला आहे.नाणे टंचाईचा फटका फक्त ग्राहकांना बसतो असे नव्हे, तर व्यापारीसुद्धा त्रस्त आहेत. नाणे विकत घेऊनसुद्धा ती कधी ना कधी संपते, मग पुन्हा त्यासाठीच त्रस्त व्हावे लागते. जेव्हा १७२ रुपये बिल होते तेव्हा व्यापारी वरचे २ रुपये कमी करून ग्राहकांकडून १७० रुपये घेतात. अशा प्रकारे आपला माल विकताना चिल्लरअभावी केवळ ग्राहक समाधानासाठी व्यापाऱ्यांना तडजोड करावी लागते. चिल्लरची कटकट कायमची दूर होण्यासाठी एकतर सर्व प्रकारचे भाडे, मालाच्या किमती पूर्णांकात ठेवण्यात याव्यात किंवा रिझर्व्ह बँकेकडून चिल्लर मोठ्या प्रमाणात वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी, अशी व्यापारी आणि ग्राहकांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)