शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

काँग्रेसची किटकिट बंद करा

By admin | Updated: February 18, 2017 02:46 IST

काँग्रेसने आजवर दलित, मुस्लिमांना भाजपाची भीती दाखवून मते घेतली. या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसचे तेच घिसेपिटे उमेदवार उभे आहेत.

नितीन गडकरी : तब्बल १० सभांचा झंझावात नागपूर : काँग्रेसने आजवर दलित, मुस्लिमांना भाजपाची भीती दाखवून मते घेतली. या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसचे तेच घिसेपिटे उमेदवार उभे आहेत. ते पुन्हा धर्मांधता, जातीयवादाची टेप वाजवतील. मतदानाच्या माध्यमातून त्यांची ही किटकिट कायमची संपवा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांनी शुक्रवारी तब्बल १० सभा घेत प्रचाराचा झंझावात केला. अत्रे ले-आऊट, मुंजे चौक, चोपडे लॉन, हिल टॉप, कपिलनगर चौक, जनता चौक, वैशाली नगर, शांतिनगर, अंबेनगर येथील सभांमध्ये गडकरी यांनी गेल्या अडीच वर्षात केंद्र व राज्य सरकारने नागपूरसाठी केलेल्या कामाचा आलेख मांडला. या सभांना भाजपाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गेली १५ वर्र्षे आम्ही केवळ मिहानचे नावच ऐकत होतो. परंतु आम्ही सत्तेवर येताच मिहानला गती मिळाली. उद्योग आणले. नऊ हजार लोकांना रोजगार मिळाला असून पाच वर्षात हा आकडा ५० हजारावर जाईल. नागपूर शहराला स्मार्ट शहर बनवण्याच्या दिशेने कामे सुरू आहेत. नऊ हजार कोटी रुपयांच्या मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. बुटीबोरी येथे लवकरच १८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प येणार आहे. मिहानमध्ये १० हजार युवकांना रोजगार दिला आहे. येत्या दोन महिन्यात इलेक्ट्रिकवर ४०० टॅक्सी शहरात धावतील. बायो डिझेलवर चालणाऱ्या बसेस सुरू झाल्या आहेत. नागपुरातील ५० हजार गरिबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी असायला हवा. त्यामुळे कामासाठी पैसे मागणाऱ्याला चोप द्या, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी) सिमेंट रस्ते २०० वर्षांसाठी खड्डेमुक्त शहरात दोन हजार कोटी रुपयांचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. अतिशय चांगल्या दर्जाचे हे काम होत असून २०० वर्षे या रोडला खड्डे पडणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला. ७५ ते ८० टक्के मतदान व्हावे सध्या मोबाईलचा जमाना आहे. कुणी मतदान केले कुणी नाही, याची लगेच माहिती मिळते. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान व्हावे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये किमान ७० ते ८० टक्के मतदान व्हावे, असा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नेम लकवाछाप मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व विकास कामे बंद पाडली होती. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच मिळाला नाही, अशी टीका करीत गडकरी यांनी पुन्हा एकदा कुणाचेही नाव न घेता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नेम साधला.