शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

वातावरण बदलाचा मृग बहराला बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:09 IST

ब्रिजेश तिवारी कोंढाळी: वातावरणात अचानक झालेला बदल. यासोबतच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या वादळी पावसाचा फटका संत्र्यांच्या मृग बहराला बसण्याची ...

ब्रिजेश तिवारी

कोंढाळी: वातावरणात अचानक झालेला बदल. यासोबतच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या वादळी पावसाचा फटका संत्र्यांच्या मृग बहराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा काटोल आणि नरखेड तालुक्यात संत्र्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना गत तीन वर्षांपासून बसतो आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन व कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. प्रसंगी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. रबीच्या गहू,चना या पिकांचे उत्पादन कमी असूनही भाव मिळाला नाही. यंदा उन्हाळ्यात तापमानात योग्य वाढ झाली नाही. सतत ढगाळ वातावरण व वादळी पावसाच्या फटक्याने संत्रा बागा थंडावल्या. बहुतांश संत्रा उत्पादकांच्या बागामध्ये मृग बहराची फूट होण्याची शक्यता कमी झाली आहे. अक्षय तृतीयेपासून शेतकरी संत्रा झाडांना पाणी देणे बंद करतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात संत्रा झाडे वाळू लागतात. ग्रामीण भाषेत याला झाडाला ताण देणे असे म्हणतात. नंतर जूनमध्ये जोरदार पाऊस येतो तेव्हा ही संत्रा झाडे पांढऱ्या फुलांनी बहरून जातात. नंतर याच फुलांचे रुपांतर फळात होते. पण वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदा या प्रक्रियेत खंड पडला. यामुळे बहार फुटण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी पावसामुळे संत्रा झाडांना पुरेसा ताणच मिळाला नाही. त्यामुळे यंदा मृग बहारच्या संत्र्यांची फूट कमी होणार. फूट झाली तरी मोठ्या प्रमाणात गळती होणार अशी माहिती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ.प्रदीप दवने यांनी दिली आहे.