शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाचा मृग बहराला बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:09 IST

ब्रिजेश तिवारी कोंढाळी: वातावरणात अचानक झालेला बदल. यासोबतच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या वादळी पावसाचा फटका संत्र्यांच्या मृग बहराला बसण्याची ...

ब्रिजेश तिवारी

कोंढाळी: वातावरणात अचानक झालेला बदल. यासोबतच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या वादळी पावसाचा फटका संत्र्यांच्या मृग बहराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा काटोल आणि नरखेड तालुक्यात संत्र्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना गत तीन वर्षांपासून बसतो आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन व कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. प्रसंगी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. रबीच्या गहू,चना या पिकांचे उत्पादन कमी असूनही भाव मिळाला नाही. यंदा उन्हाळ्यात तापमानात योग्य वाढ झाली नाही. सतत ढगाळ वातावरण व वादळी पावसाच्या फटक्याने संत्रा बागा थंडावल्या. बहुतांश संत्रा उत्पादकांच्या बागामध्ये मृग बहराची फूट होण्याची शक्यता कमी झाली आहे. अक्षय तृतीयेपासून शेतकरी संत्रा झाडांना पाणी देणे बंद करतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात संत्रा झाडे वाळू लागतात. ग्रामीण भाषेत याला झाडाला ताण देणे असे म्हणतात. नंतर जूनमध्ये जोरदार पाऊस येतो तेव्हा ही संत्रा झाडे पांढऱ्या फुलांनी बहरून जातात. नंतर याच फुलांचे रुपांतर फळात होते. पण वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदा या प्रक्रियेत खंड पडला. यामुळे बहार फुटण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी पावसामुळे संत्रा झाडांना पुरेसा ताणच मिळाला नाही. त्यामुळे यंदा मृग बहारच्या संत्र्यांची फूट कमी होणार. फूट झाली तरी मोठ्या प्रमाणात गळती होणार अशी माहिती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ.प्रदीप दवने यांनी दिली आहे.