शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

वातावरण बदलाचा मृग बहराला बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:09 IST

ब्रिजेश तिवारी कोंढाळी: वातावरणात अचानक झालेला बदल. यासोबतच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या वादळी पावसाचा फटका संत्र्यांच्या मृग बहराला बसण्याची ...

ब्रिजेश तिवारी

कोंढाळी: वातावरणात अचानक झालेला बदल. यासोबतच ऐन उन्हाळ्यात होत असलेल्या वादळी पावसाचा फटका संत्र्यांच्या मृग बहराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा काटोल आणि नरखेड तालुक्यात संत्र्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना गत तीन वर्षांपासून बसतो आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन व कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. प्रसंगी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. रबीच्या गहू,चना या पिकांचे उत्पादन कमी असूनही भाव मिळाला नाही. यंदा उन्हाळ्यात तापमानात योग्य वाढ झाली नाही. सतत ढगाळ वातावरण व वादळी पावसाच्या फटक्याने संत्रा बागा थंडावल्या. बहुतांश संत्रा उत्पादकांच्या बागामध्ये मृग बहराची फूट होण्याची शक्यता कमी झाली आहे. अक्षय तृतीयेपासून शेतकरी संत्रा झाडांना पाणी देणे बंद करतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात संत्रा झाडे वाळू लागतात. ग्रामीण भाषेत याला झाडाला ताण देणे असे म्हणतात. नंतर जूनमध्ये जोरदार पाऊस येतो तेव्हा ही संत्रा झाडे पांढऱ्या फुलांनी बहरून जातात. नंतर याच फुलांचे रुपांतर फळात होते. पण वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदा या प्रक्रियेत खंड पडला. यामुळे बहार फुटण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ

जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी पावसामुळे संत्रा झाडांना पुरेसा ताणच मिळाला नाही. त्यामुळे यंदा मृग बहारच्या संत्र्यांची फूट कमी होणार. फूट झाली तरी मोठ्या प्रमाणात गळती होणार अशी माहिती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ.प्रदीप दवने यांनी दिली आहे.