शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

स्वच्छ भारत अभियानाच्या खासगीकरणाचा घाट!

By admin | Updated: February 24, 2016 03:11 IST

स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. ही एक राष्ट्रीय चळवळ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच ..

प्रकल्पावर प्रश्नचिन्ह : राज्यातील ८०० कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यातगणेश हूड नागपूर स्वच्छ भारत अभियानाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. ही एक राष्ट्रीय चळवळ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच या अभियानातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून या अभियानाच्या खासगीकरणाचा घाट राज्य सरकारने घातला आहे. सरकारच्या नवीन धोरणानुसार स्वयंसेवी संस्थांवर ही जबाबदारी सोपविल्यास राज्यातील ८०० कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहे. अभियानात राज्यात तालुका स्तरावर ११५० तर जिल्हा परिषद स्तरावर ४५० कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला आहे. राज्यभर हागणदारी मुक्तीची चळवळ उभी करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु नवीन धोरणामुळे यातील निम्मे कर्मचारी घरी बसणार आहेत. पाणी स्वच्छता साहाय्य संस्था व खात्याअंतर्गत कामकाजातील सुसूत्रता व खासगी संस्थांच्या सहभागासंदर्भात चाचपणी करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. अभियानातील कर्मचारी गेल्या १२ वर्षांपासून सेवेत आहेत. भविष्यात नोकरीत कायम केले जाईल, या आशेने अनेकांनी खासगी संस्थांतील नोकऱ्या नाकारल्या. परंतु आता त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट आले आहे. शासनाचे अद्याप निर्देश नाहीस्वच्छ भारत अभियानात सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्यासंदर्भात शासन स्तरावर प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप शासनाकडून यासंदर्भात कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या विषयावर अधिक माहिती देता येणार नाही. गणेश चौधरी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. अभियानावर प्रश्नचिन्ह स्वच्छ भारत अभियान ही एक राष्ट्रीय चळवळ व्हावी, असे आवाहन सत्ताधारी करीत असतानाच शासकीय यंत्रणेला समांतर असे सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागा घेणार आहेत. त्यामुळे या अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हागणदारी मुक्तीला धक्काराज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी गावागावात लोकचळवळ उभी करण्यात कंत्राटी स्वच्छता दूतांची भूमिका महत्त्वाची आहे. घरात शौचालय उभारण्याची हाक देत पहाटे गावाच्या गोदरीत हातात गुलाबाचे फूल घेऊ न उभे राहून लोकांचे मतपरिवर्तन करण्यातही यांची महत्त्वाची भूमिका आहे. या कर्मचाऱ्यांना कमी केल्यास हागणदारीमुक्त अभियानालाही जबर धक्का बसणार आहे.