शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

रात्रभर जागले मनपाचे स्वच्छता दूत

By admin | Updated: October 24, 2015 03:10 IST

दीक्षाभूमीवर लाखो भाविक आले. विविध संघटनांनी त्यांच्यासाठी नाश्ता, भोजन, पाणी आदीची व्यवस्था केली. तेवढाच कचराही तयार झाला.

दीक्षाभूमी परिसर केला स्वच्छ : २२५ टन कचरा केला गोळानागपूर : दीक्षाभूमीवर लाखो भाविक आले. विविध संघटनांनी त्यांच्यासाठी नाश्ता, भोजन, पाणी आदीची व्यवस्था केली. तेवढाच कचराही तयार झाला. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता दूताची भूमिका बजावत परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. सफाई कर्मचारी गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी सकाळी ६ पर्यंत जागले व सफाई अभियान राबवत संपूर्ण कचरा गोळा करून भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत पोहचविला. यामुळे लाखोंची गर्दी होऊनही दीक्षाभूमी परिसर दुसऱ्या दिवशी स्वच्छ असल्याचे पहायला मिळाले.दीक्षाभूमी व परिसराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी एक कृती आराखडा तयार केला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. सफाईसाठी आरोग्य विभागातील एक हजार कर्मचारी, शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेली कंपनी कनक रिसोर्स मॅनेजमेंटचे २०० कर्मचारी या कामी लावण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व झोनल अधिकारी तैनात होते. दीक्षाभूमी परिसर व दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर कचरा टाकण्यासाठी एकूण १५० ड्रम ठेवण्यात आले होते. खाली पडलेला कचरा सफाई कर्मचारी लागलीच उचलून ड्रममध्ये टाकत होते. ड्रममधील कचरा नेण्यासाठी ३५ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर या गाड्या फिरत होत्या. गुरुवारी दिवसभर गोळा झालेला कचरा या गाड्यांनी भांडेवाडे डम्पिंग यार्डमध्ये पोहचविला. गुरुवारी एका दिवसात तब्बल २२५ टन कचरा गोळा करण्यात आला. तर गेल्या चार दिवसात एकूण सुमारे ३०० टन कचरा गोळा करण्यात आला. शुक्रवारी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त नयना गुंडे यांनी यांनी स्वच्छतेची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)शौचालयातही दुर्गंध नाहीदीक्षाभूमी परिसरात तात्पुरते ७१० शौचालय उभारण्यात आले होते. या शिवाय ५० सीटची व्यवस्था असलेले मोबाईल टॉयलेटही ठेवण्यात आले होते. या शौचालयाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली. शौचालयाच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आला होता. शौचालयांमध्ये सतत फवारणी केली जात आहे की नाही याची वेळोवेळी तपासणी करण्यात आली. त्यामुळेच गुरुवारी लाखो अनुयायी येऊनही पसिरात दुर्गंध येत नव्हता. दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात. मोठ्या प्रमाणात कचरा होतो. हा सर्व कचरा वेळीच उचलण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कामगारांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुवारी रात्रभर व शुक्रवारीही दिवसभर कचरा उचलण्यात आला. - डॉ. मिलिंद गणवीर, आरोग्य उपसंचालक, मनपा