शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

उमरेडच्या गजानन नगरीत नागरिकच झाले पाहरेकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST

उमरेड : मागील दोन आठवड्यापासून स्थानिक गजानन नगरी येथे भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांच्या या त्रासामुळे परिसरातील नागरिकांनी ...

उमरेड : मागील दोन आठवड्यापासून स्थानिक गजानन नगरी येथे भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांच्या या त्रासामुळे परिसरातील नागरिकांनी दरदिवशी वेगवेगळी चमू तयार केली असून, रात्रीपासून ते पहाटेपर्यंत ‘जागते रहो’ म्हणत स्वत:च पहारेकरी बनले आहेत.

उमरेड तालुक्यातील ग्रामपंचायत नवेगाव साधूअंतर्गत गजानन नगरीचा अंतर्भाव होतो. उमरेड शहरात सुमारे ३५ घरांची ही नवीन वस्ती आहे. मागील अनेक वर्षांपासून या परिसराचा नगरपालिकेत अंतर्भाव करण्यात यावा, अशी मागणी आहे. ग्रामपंचायत स्थानिकांचे प्रश्न-समस्यांकडे दुर्लक्ष करीत असून, विद्युत समस्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परिसरात विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. खांब असले तरी विद्युत तार उपलब्ध नसल्याने पथदिव्यांची सुविधाच अद्याप झाली नाही. यामुळे सायंकाळ होताच परिसरात सर्वत्र अंधार पसरतो.

महिला-तरुणी आणि लहान मुलांमध्ये भीती या परिसरात असून साप, विंचू यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी स्वखर्चातून पथदिवे लावत कशीबशी सुविधा केली आहे. अनेकदा ग्रामपंचायतीकडे याबाबत निवेदने सोपविली. चर्चा केली. अद्याप समस्याच न सुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

--

दहा जणांची चमू

परिसरात पथदिवेच नसल्याने आणि अंधार पसरल्याने ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली असतात. याचाच फायदा घेत चोरट्यांचा नेहमीच त्रास होतो. या कारणामुळे दररोज दहा जणांची चमू रात्र जागत पहारा देत आहेत. आम्ही उमरेड शहरात वास्तव्याला असतानाही आमचा भाग ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव साधू ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे परिसरात अन्य नवीन वस्तीप्रमाणे विकास कामे झाली नाही, असाही आरोप येथील नागरिकांचा आहे.