शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

नागरिकांच्या तक्रारी मंत्रालयातून गायब

By admin | Updated: September 15, 2016 02:29 IST

हिवाळी अधिवेशनात राज्याच्या विविध भागातून अनेक संघटना, संस्था, अन्यायग्रस्त, पीडित, बेरोजगार आपल्या समस्या घेऊन येतात.

माहिती अधिकारात झाला धक्कादायक प्रकार उघड : आंदोलकांत संतापनागपूर : हिवाळी अधिवेशनात राज्याच्या विविध भागातून अनेक संघटना, संस्था, अन्यायग्रस्त, पीडित, बेरोजगार आपल्या समस्या घेऊन येतात. सरकारदरबारी आपला आवाज पोहचावा म्हणून उपोषण, धरणे, मोर्चे काढतात. कुठलातरी एक मंत्री येऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन जातो. मंत्र्यांनी निवेदन स्वीकारल्यामुळे आपल्या समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा भोळ्याभाबड्या मोर्चेकऱ्यांची असते. परंतु खरचं संबंधित मंत्री, त्यांचा विभाग, मंत्रालयातील सचिव त्याला न्याय देतात का, यावर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत स्वत: मंत्र्यांनी स्वीकारलेले निवेदनच गहाळ झाल्याचे मंत्रालयातून कळविण्यात आले आहे. शासन, प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे म्हणून सरकार प्रयत्नरत आहे. आॅनलाईन तक्रारी स्वीकारण्यापासून, जनतेशी थेट संवाद साधण्यापर्यंत तंत्रज्ञान सरकारने आत्मसात केले आहे. असे असतानाही समस्या काही सुटत नाही. सर्वसामान्य मानसाला आपल्या समस्येसाठी थेट मंत्र्यापर्यंत पोहचता येत नाही, त्यामुळे मोर्चे, धरणे, उपोषणे आदी लोकशाहीचे शस्त्र हाती घ्यावे लागतात. नागपूरचे हिवाळी अधिवेशनच खरे गाजते ते मोर्चे आणि धरणे आंदोलनामुळे. सरकारही आपले मंत्रिमंडळ आणि प्रशासन घेऊन नागपुरात पोहचते. जनतेच्या समस्या सुटाव्यात म्हणून करोडो रुपयांचा खर्च करण्यात येतो. संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावली जाते. मोर्चेकरीही त्याच अपेक्षेने राज्यभरातून येतात. संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात भटक्या जमातीचा असाच एक मोर्चा १० डिसेंबर २०१५ रोजी हिवाळी अधिवेशनावर धडकला होता. या मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी स्वत: स्वीकारले होते. आॅनलाईन प्रतही नाहीनागरिकांच्या तक्रारी मंत्रालयातून गायबनागपूर : मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या मागणीच्या निवेदनावर काय कारवाई झाली, याबाबत विचारणा करण्यासाठी संघर्ष वाहिनीने सामाजिक न्याय विभागाला माहिती अधिकारात पत्र पाठविले होते. परंतु मंत्रालयातून मिळालेले उत्तराने या संघटनेचे कार्यकर्ते अवाक झाले आहे. आंदोलकांनी प्रत्यक्ष मंत्र्यांना दिलेल्या निवेदनाबाबत शोध घेतला असता सापडत नाही, तसेच आंदोलकांनी आॅनलाईन पाठविलेल्या निवेदनाची प्रत संगणकावरून उपलब्ध करून घेता येत नाही, असे उत्तर विभागाने दिले आहे. उलट आंदोलकांनाच मंत्र्यांना दिलेल्या मागण्यांच्या निवेदनाची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे.(प्रतिनिधी)