शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

‘मिशन अंत्योदय’साठी निकषपात्र ग्रामपंचायतींची निवड

By admin | Updated: June 4, 2017 17:31 IST

केंद्र शासनाने सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात मिशन अंत्योदय राबविण्याची घोषणा केली आहे.

जितेंद्र दखने 

अमरावती केंद्र शासनाने सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात मिशन अंत्योदय राबविण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत सन २०१९ पर्यंत ग्रामपंचायतींना द्रारिद्रयमुक्त करणे व १ कोटी ग्रामीण कुटुंब द्रारिद्रयरेषेच्यावर आणण्यात येणार आहेत.मिशन अंत्योदय अंतर्गत राज्यासाठी ५ हजार २२७ ग्रामपंचायतींचे उद्दिष्ट्य दिले आहे. ग्रामपंचायतींची या मिशनसाठी निवड करण्यासाठी आठ निकष निश्चित केले असून याद्वारे ग्रापंची निवड करण्याच्या सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत. केंद्र शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीतून हे उद्दिष्ट्य साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी आता मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील निकषपात्र ग्रामपंचायतींची चाचपणी जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे. यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या आठ निकष पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतीच यामध्ये निवडल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायती मिशनसाठी पात्र ठरतात, हे लवकरच पडताळणीनंतर स्पष्ट होईल. त्यानंतर पात्र ग्रामपंचायतींची यादी शासनाकडे पाठविली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.काय आहेत आठ निकष ?हागणदारीमुक्त ग्रामपंचायत, दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगट कार्यरत असलेल्या ग्रामपंचायती, जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्रामपंचायती, सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेली ग्रामपंचायत, रूरर्बन क्लस्टर योजनेंतर्गत निवडलेली ग्रामपंचायत, गुन्हेगारीमुक्त व तंटामुक्त ग्रामपंचायत, राज्य शासनाकडून विशेष लाभासाठी निवडलेली ग्रामपंचायत व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींची मिशन अंत्योदयसाठी निवड करण्यात येणार आहेत.काय आहेत शासनाच्या सूचना ?‘मिशन अंत्योदय’साठी वरील निकषांमध्ये बसणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश करावा. हे करताना या ग्रामपंचायतींच्या सभोवतालच्या १० ग्रामपंचायत समूहाचा कस्टर प्राधान्याने करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. अभियानांतर्गत ग्रामपंचायत तसेच राज्य शासनाकडून खालील बांधिलकी केंद्र शासनाला अपेक्षित आहे. यामध्ये द्रारिद्रय निर्मूलनासाठी तसेच ग्रामसभेतील सक्रिय सहभागाबाबत ग्रापं कटिबद्ध असावी, गावांतील स्वयंसहायता बचतगट प्रत्येक कुटुंबासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करावा, लोकसहभागातून गावविकास आराखडा तयार करण्यास कटिबद्धता असावी, मानव संसाधन व सशक्तीकरण, आदर्शवाद, माहिती, शिक्षण व संप्रेषण इत्यादींंबाबत कटिबद्ध असावे.