शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

चीन हे गृहित न धरता येणारे राष्ट्र

By admin | Updated: July 30, 2015 03:24 IST

शेजारच्या राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे केले.

नागपूर : शेजारच्या राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे केले. यात अनेक देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. पंतप्रधानांनी चीनचाही दौरा केला आहे. पण मोदी यांच्या दौऱ्यानंतर भारत आणि चीन यांचे संबंध संपूर्ण मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे झाले, असे मानणे गैर आहे. चीन अतिशय मुत्सद्दी आणि गृहित न धरता येणारे राष्ट्र आहे, असे मत इंडियन असोसिएशन आॅफ शांघायचे अध्यक्ष अमित विनय वाईकर यांनी व्यक्त केले. भारत-चीन संबंध आणि भारतीय उद्योजकांना संधी विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्हीआयएच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी मोदी यांनी केलेल्या चीन दौऱ्याची माहिती दिली. या दौऱ्यासाठी कशा प्रकारची तयारी करण्यात आली आणि या दौऱ्याकडे पाहण्याचा चीनचा दृष्टिकोन कसा होता, हे त्यांनी सांगितले. चीन हा वरवर पाहिले तर साम्यवादी वाटतो. तेथे साम्यवादी पक्षाचेही निर्विवाद वर्चस्व आहे. पण चीन अमेरिकेपेक्षाही भांडवलवादी आहे. यामुळेच त्यांनी आतापर्यंत इतका विकास केला आहे. चीन कधीही विदेशी कंपन्यांच्या उत्पादनांचे युनिट सुरू करण्याला विरोध करीत नाही. केवळ त्या कंपनीने त्यांच्या उत्पादनांचे संपूर्ण उत्पादन चीनमध्येच करावे, अशी त्यांची अट असते. चीन जागतिक स्तरावर छोटा डॉन म्हणून उभा असताना चीनच्या काही समस्याही आहेत. तेथे प्रत्येकालाच यश गाठायचे आहे. चिनी कंपन्यांनी व्हिएतनाम, फिलिपिन्स या देशांमध्ये विस्तार सुरू केला आहे. पण या कंपन्या भारतात येत नाही कारण भारतावर विश्वास नाही. भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण नसल्याची भावना तेथील कंपन्यांमध्ये आहे. या कंपन्या यायच्या असतील तर आपल्याला त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला नागपूर फर्स्ट या उद्योजक संस्थेचे फैझ वाहिद, व्हीआयएच्या इकॉनॉमिक फोरमचे ओ. एस. बागडिया, हेमंत लोढा, आसित सिन्हा आदी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. चिनी कंपन्या मुत्सद्दी आहेत पण त्यांना फिलिपीन्स, व्हिएतनाम येथे उद्योगाला मर्यादा पडणार आहे. वैदर्भीय उद्योजकांनी सुयोग्य पद्धतीने त्यांना आमंत्रण दिले तर वैदर्भीय उद्योजकांना या कंपन्यांचे स्थानिक भागीदार होऊन लाभ मिळवणे शक्य आहे, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)