शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

चीन हे गृहित न धरता येणारे राष्ट्र

By admin | Updated: July 30, 2015 03:24 IST

शेजारच्या राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे केले.

नागपूर : शेजारच्या राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे केले. यात अनेक देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. पंतप्रधानांनी चीनचाही दौरा केला आहे. पण मोदी यांच्या दौऱ्यानंतर भारत आणि चीन यांचे संबंध संपूर्ण मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे झाले, असे मानणे गैर आहे. चीन अतिशय मुत्सद्दी आणि गृहित न धरता येणारे राष्ट्र आहे, असे मत इंडियन असोसिएशन आॅफ शांघायचे अध्यक्ष अमित विनय वाईकर यांनी व्यक्त केले. भारत-चीन संबंध आणि भारतीय उद्योजकांना संधी विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्हीआयएच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी मोदी यांनी केलेल्या चीन दौऱ्याची माहिती दिली. या दौऱ्यासाठी कशा प्रकारची तयारी करण्यात आली आणि या दौऱ्याकडे पाहण्याचा चीनचा दृष्टिकोन कसा होता, हे त्यांनी सांगितले. चीन हा वरवर पाहिले तर साम्यवादी वाटतो. तेथे साम्यवादी पक्षाचेही निर्विवाद वर्चस्व आहे. पण चीन अमेरिकेपेक्षाही भांडवलवादी आहे. यामुळेच त्यांनी आतापर्यंत इतका विकास केला आहे. चीन कधीही विदेशी कंपन्यांच्या उत्पादनांचे युनिट सुरू करण्याला विरोध करीत नाही. केवळ त्या कंपनीने त्यांच्या उत्पादनांचे संपूर्ण उत्पादन चीनमध्येच करावे, अशी त्यांची अट असते. चीन जागतिक स्तरावर छोटा डॉन म्हणून उभा असताना चीनच्या काही समस्याही आहेत. तेथे प्रत्येकालाच यश गाठायचे आहे. चिनी कंपन्यांनी व्हिएतनाम, फिलिपिन्स या देशांमध्ये विस्तार सुरू केला आहे. पण या कंपन्या भारतात येत नाही कारण भारतावर विश्वास नाही. भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण नसल्याची भावना तेथील कंपन्यांमध्ये आहे. या कंपन्या यायच्या असतील तर आपल्याला त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला नागपूर फर्स्ट या उद्योजक संस्थेचे फैझ वाहिद, व्हीआयएच्या इकॉनॉमिक फोरमचे ओ. एस. बागडिया, हेमंत लोढा, आसित सिन्हा आदी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. चिनी कंपन्या मुत्सद्दी आहेत पण त्यांना फिलिपीन्स, व्हिएतनाम येथे उद्योगाला मर्यादा पडणार आहे. वैदर्भीय उद्योजकांनी सुयोग्य पद्धतीने त्यांना आमंत्रण दिले तर वैदर्भीय उद्योजकांना या कंपन्यांचे स्थानिक भागीदार होऊन लाभ मिळवणे शक्य आहे, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)