शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

चीन हे गृहित न धरता येणारे राष्ट्र

By admin | Updated: July 30, 2015 03:24 IST

शेजारच्या राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे केले.

नागपूर : शेजारच्या राष्ट्रांशी सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रांचे दौरे केले. यात अनेक देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. पंतप्रधानांनी चीनचाही दौरा केला आहे. पण मोदी यांच्या दौऱ्यानंतर भारत आणि चीन यांचे संबंध संपूर्ण मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे झाले, असे मानणे गैर आहे. चीन अतिशय मुत्सद्दी आणि गृहित न धरता येणारे राष्ट्र आहे, असे मत इंडियन असोसिएशन आॅफ शांघायचे अध्यक्ष अमित विनय वाईकर यांनी व्यक्त केले. भारत-चीन संबंध आणि भारतीय उद्योजकांना संधी विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्हीआयएच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी मोदी यांनी केलेल्या चीन दौऱ्याची माहिती दिली. या दौऱ्यासाठी कशा प्रकारची तयारी करण्यात आली आणि या दौऱ्याकडे पाहण्याचा चीनचा दृष्टिकोन कसा होता, हे त्यांनी सांगितले. चीन हा वरवर पाहिले तर साम्यवादी वाटतो. तेथे साम्यवादी पक्षाचेही निर्विवाद वर्चस्व आहे. पण चीन अमेरिकेपेक्षाही भांडवलवादी आहे. यामुळेच त्यांनी आतापर्यंत इतका विकास केला आहे. चीन कधीही विदेशी कंपन्यांच्या उत्पादनांचे युनिट सुरू करण्याला विरोध करीत नाही. केवळ त्या कंपनीने त्यांच्या उत्पादनांचे संपूर्ण उत्पादन चीनमध्येच करावे, अशी त्यांची अट असते. चीन जागतिक स्तरावर छोटा डॉन म्हणून उभा असताना चीनच्या काही समस्याही आहेत. तेथे प्रत्येकालाच यश गाठायचे आहे. चिनी कंपन्यांनी व्हिएतनाम, फिलिपिन्स या देशांमध्ये विस्तार सुरू केला आहे. पण या कंपन्या भारतात येत नाही कारण भारतावर विश्वास नाही. भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण नसल्याची भावना तेथील कंपन्यांमध्ये आहे. या कंपन्या यायच्या असतील तर आपल्याला त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला नागपूर फर्स्ट या उद्योजक संस्थेचे फैझ वाहिद, व्हीआयएच्या इकॉनॉमिक फोरमचे ओ. एस. बागडिया, हेमंत लोढा, आसित सिन्हा आदी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. चिनी कंपन्या मुत्सद्दी आहेत पण त्यांना फिलिपीन्स, व्हिएतनाम येथे उद्योगाला मर्यादा पडणार आहे. वैदर्भीय उद्योजकांनी सुयोग्य पद्धतीने त्यांना आमंत्रण दिले तर वैदर्भीय उद्योजकांना या कंपन्यांचे स्थानिक भागीदार होऊन लाभ मिळवणे शक्य आहे, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)