शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

चिमुकले चार दिवसांपासून उपाशी

By admin | Updated: December 14, 2015 03:07 IST

सध्या नागपुरात कोट्यवधी रुपये खर्च करून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या रोजच्या पार्ट्या रंगत आहेत.

शासकीय बालगृहातील रेशन झाले बंद : कोण घेणार दखल ?मंगेश व्यवहारे  नागपूरसध्या नागपुरात कोट्यवधी रुपये खर्च करून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या रोजच्या पार्ट्या रंगत आहेत. दुसरीकडे नागपुरातीलच बालगृहात राहणारी २०० च्या जवळपास मुले गेल्या चार दिवसांपासून अन्नाविना उपाशी आहेत. महिला व बाल विकास विभागांतर्गत संचालित शासकीय मुला, मुलींच्या बालगृहात कंत्राटदारांनी रेशनचा पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांचे चार वर्षापासूनचे थकीत बिलन मिळाल्याने, अधिकाऱ्यांकडूनही कुठलेच समाधान न झाल्याने कंत्राटदारांनी हा निर्णय घेतला आहे. नागपुरात शासकीय मुला,मुलींचे चार बालगृह आहेत. यात २०० च्या जवळपास मुले, मुली वास्तव्यास आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. निराधार, अत्याचार पीडित, बेवारस, बालमजूर, बेपत्ता झालेली व कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने प्रत्येक जिल्ह्यात बालगृहे स्थापन केली आहेत. नागपुरात काटोल रोडवर मुलींचे तर पाटणकर चौक येथे शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह व वरिष्ठ बालगृह आहेत. या बालगृहांना कंत्राटदाराच्या माध्यमातून अन्न-धान्याचा पुरवठा करण्यात येतो. शासनाच्या निकषानुसार मुलांना दररोज दूध, नाश्त्यात फळ, अंडी आणि दोन वेळेचे जेवण शासनाकडून उपलब्ध करण्यात येते. केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेच्या माध्यमातून या वसतिगृहांना निधीचा पुरवठा करण्यात येतो. नागपुरातील चारही वसतिगृहांना अन्न-धान्य व साहित्य, फळ आणि भाज्या, अंडी, दुध पुरवठा करणारे चार वेगवेगळे कंत्राटदार आहेत. कंत्राटदारांचे बिल थकीतनागपूर : कंत्राटदारांचे चार-चार वर्षांपासून बिल थकीत आहे. चारही वसतिगृहात अन्न-धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे २० लाख, भाजी व फळ पुरवठादारांचे २५ लाख, दुधाच्या पुरवठादाराचे १२ लाख व अंडी पुरवठादारांचे सहा लाख रुपये थकीत आहेत. पुरवठादारांनी थकीत बिलासाठी महिला व बाल कल्याणच्या विभागीय अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु थकीत बिल मिळाले नाही. शेवटी कंत्राटदारांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या सचिवांशी थेट संपर्क साधून थकीत बिलांची मागणी केली. मात्र त्यांच्या उत्तराने कंत्राटदारांचे समाधान झाले नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी १० डिसेंबरपासून बालगृहांना पुरवठा बंद केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बालगृहांतील मुलांना दूध, फळ, भाज्या मिळालेल्या नाही. कंत्राटदार थकीत बिलासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी मात्र सुस्त बसले आहेत. (प्रतिनिधी)