शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना मूड रमला घरात, अभ्यासाची पुस्तके दप्तरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:06 IST

- चवथीपर्यंतची मुले यंदाही शाळेविनाच : मित्रमंडळी, अभ्यासाचा पडतोय विसर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शाळा हे विद्येचे मंदिर ...

- चवथीपर्यंतची मुले यंदाही शाळेविनाच : मित्रमंडळी, अभ्यासाचा पडतोय विसर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शाळा हे विद्येचे मंदिर आणि बालवयातील सर्वांगीण विकासासाठी शाळा हे सर्वोत्तम स्थळ मानले जाते. मात्र, गेल्या १६-१७ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी चिमुकल्यांना मॅडम रागावतात किंवा लाड करतात, याच्या पलीकडे अ, ब, क - ए, बी, सी, डी म्हणा किंवा एक, दोन, तीन - वन, टू, थ्री म्हणा याशी काही देणेघेणे राहिले नाही. लॉकडाऊनमध्ये मुलांचे संपूर्ण लक्ष आई-वडील-आजी-आजोबांसोबत रमण्यातच आहे. पालकांनी कितीही शिकवितो म्हटले तरी शिक्षकांची किमया साधणे कठीण आहे. अभ्यासाची पुस्तके दप्तरात (बॅग) आणि मुले रमली घरात, अशी स्थिती सर्वदूर आहे.

जिल्ह्यात १ ते ४ चे विद्यार्थी

- जिल्हा परिषदेच्या शाळा - २४२३०

- नगर परिषदेच्या शाळा - ९३४०

- महापालिकेच्या शाळा - ८३२०

- अनुदानित शाळा - १ लाख ३४ हजार

- विना अनुदानित शाळा - ९७५६०

अक्षर-अंक ओळख विसरले

* नवाकर्षण हे बालवयातील प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे, या वयात बालकांच्या मनावर-मेंदूवर ज्या गोष्टींचा सतत प्रभाव टाकला जातो, त्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतात.

* दीर्घकालीन लॉकडाऊन आणि शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षकी भयाचा सामना करावा लागत नाही.

* मोबाईल हे तसेही आभासी माध्यम आहे आणि स्क्रिन सतत बदलत असल्याने यातून मिळणारे शिक्षणही क्षणिक स्मरणाचे ठरते.

* पहिली व दुसरीचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गात केवळ ऐकू शकतात. ते किमी स्मरणात राहिल हे सांगता येत नाहीत. त्यामुळे, अक्षर-अंकाची ओळख प्रारंभीच अडखळली आहे.

* दुसरी व चवथीचे विद्यार्थी नव अक्षर-अंक शिकण्यापासून वंचित होत आहे. पहिली व दुसरीमध्ये घेतलेली अक्षर-अंक ओळख विसरत चालले आहेत.

अभ्यास टाळण्याची अनेक कारणे

* खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांसाठी अभ्यास हा कंटाळवाणा विषय असतो.

* मधातच भूक लागली, झोप लागली हे कारणे पुढे येतात.

* पालक शिकवित असताना मुले डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न करतात. हे काय, ते काय असे प्रश्न विचारतात.

* अचानक, खेळण्याची इच्छा व्यक्त केली जाते.

* इच्छापूर्तीस नकार दिल्यास अश्रूविहीन रडणे अर्थात नुसतेच ओरडणे सुरू होते.

कोट -

हा काळ फायद्याचा अन् तोट्याचा

दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे मुले जास्तीत जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवत आहेत. याच वयात मुले ऑनलाईन होत आहेत, शिक्षकही तंत्रज्ञान प्रशिक्षित होत आहेत, ही चांगली बाब झाली. मात्र, मोबाईल आणि सतत घरी राहत असल्याचे चिडचिडे होत आहेत, हा तोटा आहे. मुलांना मिसळता येत नाही, शिक्षकांशी थेट आमना-सामना करता येत नाही, या त्रुटी या काळात दिसून येत आहेत. हे वर्षही पहिली ते चवथीच्या मुलांना शाळेविनाच घालवावे लागणार आहे. पालकांनी आता मुलांना आपल्या प्रत्येक गोष्टी इन्व्हॉल्व्ह करून त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची तयारी ठेवावी. मात्र, शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा या विद्यार्थ्यांना हाताळणे हे शिक्षकांसाठी प्रचंड आव्हानात्मक असणार आहे.

- रवींद्र फडणवीस, शिक्षणतज्ज्ञ

पालकांची होतेय अडचण

मुलांचे लाड पूर्ण करणे, ही प्रत्येक पालकांची हौस असते. मात्र, शिक्षण देणे तेवढेच अवघड. मुलांच्या मनात पालक आणि शिक्षकांसाठी वेगवेगळे स्थान असते. त्याचे वर्गीकरण त्यांच्याच डोक्यात आपसुकच झालेले असते. त्यामुळे, शिक्षकांसारखे शिकविण्याचा प्रयत्न करणारे पालक मुलांसाठी कायम विनोदाच विषय असतो. आपले रडगाणे ज्यांच्याजवळ मांडतो, तोच पालक शिक्षकांसारखा बघण्याचा इच्छा त्यांची नसते. त्यामुळेच, पालकांची मोठी अडचण या काळात होत असल्याचे दिसून येते.

रोजगाराच्या टेेन्शनमध्ये पालक

कोरोना काळात अनेक पालकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. ती समस्या वाढतच चालली. अशा स्थितीत पालक घरगाडा चालविण्यासाठी सतत रोजगाराच्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांना सतत बाहेर पडावे लागत आहे. अशा स्थितीत कोवळ्या वयातील मुलांना शिकवावे कसे आणि शिकविले तरी त्यांची मानसिकता समजण्यास अडचण निर्माण होत असल्याचे अनेकांच्या संवादातून स्पष्ट झाले.

............................