शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळी केवळ स्पर्धाजीवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बालरंगभूमीचा विचार केला असता महाराष्ट्रात बालनाट्य चळवळीचे अस्तित्त्व काय, बालकांनी नाटक करायचे म्हणजे त्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बालरंगभूमीचा विचार केला असता महाराष्ट्रात बालनाट्य चळवळीचे अस्तित्त्व काय, बालकांनी नाटक करायचे म्हणजे त्याला बालरंगभूमी म्हणायचे का, ही चळवळ कशी काय असू शकते, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळ ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित असून सांस्कृतिक संचालनालयाने बालनाट्य स्पर्धा बंद केल्या तर पितळ उघडे पडेल. त्यामुळे, महाराष्ट्रातील बालनाट्यचळवळ ही केवळ स्पर्धाजीवी असल्याचे मत प्रख्यात बालनाटककार व नाट्यसमीक्षक डॉ. सतीश साळुंखे यांनी व्यक्त केले.

बहुजन रंगभूमीच्यावतीने आयोजित द्विदिवसीय बालनाट्य महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी ऊरुवेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात झाला. महोत्सवाच्या ‘बालरंगभूमीची आजची गरज’ या परिसंवादात महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून साळुंखे बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध नाट्यसमीक्षक डॉ. सतीश पावडे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय, प्रभाकर दुपारे व बहुजन रंगभूमीचे वीरेंद्र गणविर उपस्थित होते.

बालरंगभूमी ही कलावंत घडण्याच्या काळातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असून, रंगभूमीने मनोरंजनापेक्षा अंजनाचे काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी रंगभूमीचा अर्थ बदलून ती विचारांची युद्धभूमी व्हायला हवी. प्रस्थापितांना बहुजन, दलितांचे प्रश्न मान्य नसल्याने या रंगभूमीने आत्मभान जागृत करण्याचे कार्य करावे, असे आवाहन साळुंखे यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना दादाकांज धनविजय यांनी रंगभूमीवर वावरताना बालकलावंतांनी समजून उमजून अनुकरण करावे आणि बालनाटककार ताकदीने उभा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभाकर दुपारे यांनी बोलताना वय, काळ आणि ध्येयासोबतच स्पर्धेच्या युगाचा समन्वय साधूनच कलावंतांनी मार्गस्थ होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक वीरेंद्र गणवीर यांनी केले.

----------

पहिल्या दिवशी तीन नाटकांचे सादरीकरण

पहिल्या दिवशी बालनाट्यमहोत्सवात वीरेंद्र गणवीर लिखित तीन नाटकांचे सादरीकरण झाले. ‘थेंब थेंब श्वास’ या नाटकाचे दिग्दर्शन सुरेंद्र वानखेडे यांचे होते तर यात देव नन्नावरे, अनया शिंपी, ईश्वरी गोडबोले, दीपांशी मुरमाडे, कौशिक गणेशे यांच्या भूमिका होत्या. ‘घायाळ पाखरा’चे दिग्दर्शन रिशिल ढोबळे यांचे होते तर यात ओम राऊत, अनुष्का शेंडे, श्लोक पारवे, जिशांत मुरमाडे यांच्या भूमिका होत्या. ‘आम्हालाही पंख हवेत’चे दिग्दर्शन आशिष दुर्गे यांचे असून यात कौशिक गणेशे, पुण्या लारोकर, उन्नती गव्हाणे, पार्थ पवार, मुजफ्फर अहमद यांच्या भूमिका होत्या. बहुजन रंगभूमी, दी बुद्धिस्ट आर्ट थिएटर ऑफ इंडिया व अश्वघोष कला अकादमीच्या वतीने ही नाटके सादर झाली.

...............